The alliance with Uddhav Thackeray has taken a break : मुख्यमंत्र्यांनी साधले टाइमिंग, आपल्या बाजुने वळवली चर्चा; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक आहेत. हे पटवून दिले जात होते. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीत त्यांची सविस्तर चर्चाही झाल्याचे समोर येत आहे. मात्र, ही नवी घडामोड उद्धव-राज मनोमिलनाला ब्रेक लावू शकते. तर राजकीय जाणकार या भेटीकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. राज-उद्धव मनोमिलन हा निव्वळ मनोमिलनाचा बागलबुवा आहे. या मागे सोईचे ‘दबाव तंत्र’ असल्याचे मत व्यक्त होत आहे.
राज ठाकरे सकाळी ताज लँड्स हॉटेलमध्ये पोहोचले. काहीच मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तेथे दाखल झाले. फडणवीस यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये तेथे कोणताही कार्यक्रम नव्हता. अशात ही भेट घडल्याने, यामागे राजकीय रणनीती असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीत काय चर्चा झाली, हे अधिकृत स्पष्ट झालेलं नसल्यामुळे भाजपने पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. शिवसेना-मनसे युतीचं गणित बिघडवण्यासाठी हा राजकीय डाव असावा, असेही बोलले जात आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी या भेटीबाबत अधिकृत वक्तव्य दिलं नाही. त्यामुळे सध्या तरी निव्वळ चर्चांवरच राजकीय पट रंगला आहे.
राज-उद्धव एकत्रिकरणाच्या संदर्भात दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण या संभाव्य युतीबाबत सकारात्मक होते. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ही युती घडल्यास राजकीय समीकरण बदलू शकते. मात्र, आता या सर्व चर्चांना विराम मिळण्याची शक्यता आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन भाजप विरोधात ताकद उभी करणार, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता.
Raj Thackeray-Devendra Fadnavis : भावांच्या मनोमिलनाच्या चर्चेत राज ठाकरे, फडणवीस यांचे ‘मिलन’
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या गुऱ्हाळात, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘टाइमिंग’ साधल्याचं सांगितलं जात आहे. राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे फडणवीस यांनीच राज ठाकरे यांना योग्य वेळ साधून युतीपासून परावृत्त केलं असावं, असा कयास बांधला जात आहे. मनसे पुन्हा एकदा भाजपच्या जवळ जातेय का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. जर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असेल, तर ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
Plane crash in Ahmedabad : 232 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!
शिवसेना उद्धव ठाकरे गटात सुरू असलेली गळती थांबवणे आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, हा उद्देश असू शकतो. किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा खेळ मांडला असावा, अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. शिवाय दोन्ही ठाकरे एकत्र आले तर फक्त शिंदे गटाला फटका बसू शकतो असेही समोर आले होते.