Breaking

Raj Thackeray : मराठीचा मुद्दा, राज ठाकरेंचा गुद्दा!

 

Raj Thackeray took notice of Bhayyaji Joshi’s statement on Marathi : भय्याजी जोशी यांच्या विधानाचा घेतला समाचार, मराठी माणूस दूधखुळा नाही

Mumbai राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठीविषयी केलेल्या विधानावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात. मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. त्यावर भाजप काय कारवाई करणार आहे, असा थेट सवाल राज यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. त्याचवेळी भय्याजी जोशी यांनी इतर राज्यांमध्ये जाऊन हे विधान करून दाखवावं, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

Sudhir Mungantiwar : धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही !

देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करण्याचं काय कारण आहे? आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? असा सवाल राज यांनी केला आहे.

भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं. उद्या संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का?, असा सवालही राज यांनी केला आहे.

Ajit Pawar : राष्ट्रवादीकडून कोण होणार आमदार? कोते पाटील की सिद्धीकी ?

सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून दिसत आहेत. हे काय चाललय हे न समजण्याइतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं. हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं, हे आश्चर्याचं असल्याचं राज म्हणाले.

‘जोशीबुवांना एवढंही समजू नये?’
आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला. त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील मुंबईत येऊन मराठीत बोलून गेले. त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते. तर मग जोशीबुवांना हे समजू नये?, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Chhagan Bhujbal : महाराष्ट्राला दृष्ट लागली आहे, अध्यक्ष महोदय काहीतरी करा!

‘काड्या घालू नका’
या असल्या काड्या घालून (अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे. ३० तारखेला गुढीपाडव्याला सविस्तर बोलणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे.