Thackeray brother’s coalition still uncertain: उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना पुन्हा साद, शिंदे – फडणवीसांवर निशाणा
Mumbai: मराठी माणसाची भक्कम एकजूट पुन्हा एकदा फोडायची असेल तर संशय, संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा सुरू झाला आणि तसे झालेच.मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करायचे असेल तर मतभेद गाडून ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे या लोकभावनेची तीव्रता वाढली आहे, असे मुखपत्राच्या माध्यमातून व्यक्त होत उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना पुन्हा एकदा साद घातली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु होत्या. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या नंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा सुरु झाली. मात्र शिवसेनेच्या वर्धापनदिनी ‘सामना’तील अग्रलेखातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना साद घालण्यात आली आहे. ठाकरे बंधूंची युती होऊ नये म्हणून शिंदे गट आणि भाजप देव पाण्यात बुडवून बसले आहेत, अशी टिप्पणी करण्यात आली आहे.
Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून आपला नेता तेथे बसविण्यासाठी अघोरी विद्येचा वापर
शिवसेना व नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणा वापरून तोडल्यावरही या त्रस्त समंधांचा आत्मा शांत झालेला नाही. त्यांना महाराष्ट्राच्या राजधानीतून ‘मराठी’ माणूस कायमचा हद्दपार करायचाच आहे. हे आक्रमण थांबवायचे असेल तर मराठी ऐक्याची महागर्जना घुमवावी लागेल. त्यादृष्टीने एक ज्वलंत लोकभावना सध्या महाराष्ट्रात चर्चेला आली आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करायचे असेल तर मतभेद गाडून ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे या लोकभावनेची तीव्रता वाढली आहे व उद्धव ठाकरे यांनी मराठी ऐक्याचा हात पुढे करताच महाराष्ट्राच्या सर्व बेइमानांचे धाबे दणाणले आहेत असे म्हणले आहे.
अशा पद्धतीने ‘मराठी एकजूट’ झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे तडीपार व्हावे लागेल या भीतीने अनेकांची गाळण उडाल्याचे लेखात म्हटले आहे. ‘एसंशि’ गटापासून भाजपच्या व्यापार मंडळापर्यंत प्रत्येक जण देव पाण्यात घालून बसला आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट पुन्हा फोडायची असेल तर संशय, संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा सुरू झाला आणि तसे झालेच. मुख्यमंत्री देवेंदर फडणवीस व राज ठाकरे यांची भेट झाली, लगेच भाजप आणि ‘एसंशि’ गटात उत्सव सुरू झाला, “मराठी जनांची एकजूट मोडली हो।” म्हणून हे लोक पेढे वाटू लागले. भाजपच्या एका दैनिकाचा मथळाच सांगतोय की, ‘आनंदी आनंद गडे, चर्चा थंडावली, राज-उद्धव युतीला विराम, फडणवीस-राज भेटीमुळे युतीच्या चर्चाना अचानक ब्रेक लागला आहे.’ विषाला उकळी फुटते ती अशी. भाजप आणि फडणवीसांचा कावा यात स्पष्ट दिसतो.
Donald Trump on Operation Sindoor : ट्रम्प म्हणतात, ‘ मला पाकिस्तान आवडतो, मीच युद्ध थांबवलं’
लोकांत संभ्रम, संशय निर्माण करणे, मराठी माणसांच्या एकजुटीला ‘ब्रेक’ लागल्याचा आनंद साजरा करणे हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे. मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्षे ठामपणे उभी आहे. शिवसेना शतायुषी होईल. त्यापुढे जाईल. जे सोबत येतील त्यांना घेऊन, नाहीतर एकाकी लढून. महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सर्व घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे, पण एक मात्र नक्की, असा विश्वासही लेखातून व्यक्त करण्यात आला आहे.