Breaking

Ramdas aathavle : आठवले स्पष्टच बोलले, ‘मोदी देवाचा अवतार नाहीत’

Narendra Modi is not an incarnation of God : खासदार कंगणा रणावत यांच्या विधानावर दिली प्रतिक्रिया

Buldhana “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा नव्हे, मानवाचा अवतार आहेत,” अशी ठाम प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. अभिनेत्री कंगना राणावत यांनी मोदींना “देवाचा अवतार” म्हणत केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, आठवले बोलत होते.
ते ८ एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर असताना बुलडाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाबाबत ठाम भूमिका
रामदास आठवले म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी जर महायुतीत यावे, असा सल्ला ऐकला असता, तर एकनाथ शिंदे यांना पक्ष सोडण्याची वेळ आली नसती. ठाकरे गटातील नेते पक्षात राहतील, पण पक्ष अधिकच कमकुवत होईल,” असेही ते म्हणाले.

नितेश राणेंना ‘शैलीत सौम्यता’ ठेवण्याचा सल्ला
प्रक्षोभक विधाने करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर, आठवले म्हणाले, “शैलीतील तीव्रता कमी करणं गरजेचं आहे.”

Water issue of 14 villages resolved : १४ गावांचा पाणीप्रश्न मार्गी, खडकपूर्णाचे पाणी पाईपलाईनद्वारे मिळणार!

“मोदी चौथ्यांदा पंतप्रधान होतील” – आत्मविश्वासपूर्ण भाकीत
पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीचे कौतुक करत आठवले म्हणाले, “मोदी चौथ्यांदा पंतप्रधान होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.” वयाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, “मी सशक्त आणि माझ्या वक्तव्यावर ठाम आहे.”

अलवर प्रकरण, संविधानाची तोडफोड आणि पोलिस कारवाईबाबत भाष्य
राजस्थानमधील अलवर येथील मंदिरात मागासवर्गीय व्यक्तीच्या प्रवेशानंतर मंदिर धुतल्याच्या घटनेवर आठवले यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली. भारतीय संविधानाची प्रतिकृती फोडल्याच्या प्रकरणावर आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणावर त्यांनी गंभीर चौकशी व दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.

Malkapur Congress Meeting : ‘गद्दारांना बाजूला करा, नवख्या नेतृत्वाला संधी द्या!’

महाबोधी विहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात यावा – आठवले यांचा पाठिंबा
बिहारच्या महाबोधी विहारावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत, आठवले म्हणाले, “विहार बौद्ध धर्मियांना मिळावा, यासाठी मी पंतप्रधानांची भेट घेईन.” हा मुद्दा राज्य विधीमंडळाच्या अखत्यारितील असला तरी केंद्र शासनाकडूनही भूमिका मांडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.