Breaking

Ramesh Chennithala : मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही !

 

Ramesh Chennithala said that Modi government cannot suppress the voice of Congress : ईडीचा गैरवापर करणा-या केंद्र सरकारच्या विरोधात दादरमध्ये काँग्रेसचे आंदोलन

Mumbai : केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे. त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. मोदी-शाह अशा कारवाया करून काँग्रेस पक्षाला संपवू शकत नाहीत. अशा कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही. उलट मजबूतपणे या हुकुमशाहीचा मुकाबला करू, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ED च्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात दादर येथील इंडिया बुल्स जवळ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, मोदी सरकारने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो.

जनतेत या कारवाईबद्दल तीव्र रोष आहे. काँग्रेस पक्षाने या दडपशाही विरोधात काल व आज दोन दिवस देशभर आंदोलन केले. महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध केला. मोदी – शाह यांच्या सरकार विरोधात यापुढेही काँग्रेस पक्ष मजबूतीने लढा देईल, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

Ramesh Chennithala : रमेश चेन्नीथला महाराष्ट्र काँग्रेसच्या मानगुटीवर कायम!

या आंदोलनात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, काँग्रेसे वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार रजनी पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री अॅड. यशमोती ठाकूर, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, डॉ. विश्वजीत कदम, खासदार डॉ. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, खासदार नामदेव किरसान, खासदार बळवंत वानखेडे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार डॉ. शिवाजी काळगे.

Ramesh Chennithala : ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने, पण काँग्रेस डगमगणार नाही !

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, यु. बी. व्यंकटेश, आमदार भाई जगताप, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संघटन ऍड. गणेश पाटील, मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, रामचंद्र दळवी, ब्रीज दत्त, अभिजीत सपकाळ, श्रीरंग बर्गे, सचिव अजिंक्य देसाई, विश्वजीत हाप्पे, यशपाल भिंगे, आनंद सिंह, सुभाष पाखरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.