Breaking

Rashtriya Swayamsewak Sangh : विकसित राष्ट्रासाठी पंचसूत्रीचा संकल्प करा!

Make a five-point resolution for a developed nation : संघाच्या संपर्क प्रमुखांचे आवाहन, संघ शिक्षा वर्गाचा समारोप

Akola देशातील सध्याचा काळ हा अमृतवर्षाचा आहे. २०४७ साली आपण स्वातंत्र्याची शताद्बी साजरी करणार आहोत. तोपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सामाजिक समरसता,पर्यावरण, स्वबोध, स्वदेशी आणि कुटुंब प्रबोधन या पंचसूत्रीची कास धरा, समाजातील सज्जनशक्तीचे जागरण करा, असे आवाहन रा.स्व.संघाचे संपर्क प्रमुख शैलेश पोतदार यांनी केले.

येथील एसीसी मैदानावर आयोजित संघ शिक्षा वर्गाच्या जाहीर समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी ब्रिजमोहन चितलांगे, सर्वाधिकारी उल्हास बपोरीकर, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल उपस्थित होते.

Local Body Elections : निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय संघर्ष वाढला

ते पुढे बोलताना म्हणाले, ‘समान संस्कृती, समान जीवनमूल्य ही आमची सनातन काळापासूनची परंपरा आहे. प्रभू श्रीराम आमच्या जीवनमूल्याचे तर महाकुंभासह आमच्या एकत्वाचे अनेकानेक प्रतीक आहेत. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात हिंदू धर्मात भेद निर्माण करणार्‍या चुकीच्या बाबी समाविष्ट झाल्या असल्या तरी हे भेद, विषमता आपल्याला समरसतेच्या कृतीतून दूर करावे लागतील.’

100 Days Program : अकोल्याचे मृद व जलसंधारण कार्यालय राज्यात प्रथम

गावागावातील पाणवठे, स्मशानभूमि, विहिरी, मंदिरे यात सर्वांना सन्मानाने प्रवेश दिला जावा व यासाठी सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम आपणास करावे लागणार आहे असे पोतदार यांनी सांगितले. कथित विकसित पश्चिमी देशांनी निसर्गाचे शोषण करून पर्यावरणाचा भीषण प्रश्न निर्माण केला आहे. आमची भारतीय हिंदू संस्कृती मात्र निसर्गाचे शोषण नव्हे तर दोहन करावे असे शिकविते, असेही ते म्हणाले.

PWD Maharashtra : थकीत देयकांमुळे संतप्त कंत्राटदार आक्रमक!

वृक्षलागवड, पाण्याचे संवर्धन महत्वाचे आहेच पण सोबतच प्लॅस्टिक निर्मूलन ही चळवळ व्हावी आपणास पर्यावरण स्नेही बनावे लागेल.शिवाय स्वदेशी आचरण जीवनात आणावे लागेल.घरात विदेशी वस्तू आपण आणणार नाही असा संकल्प सर्व समाजाने करावा असे आवाहन त्यांनी केले.
भाषा आणि भूषा हे स्वदेशीच असावे असे म्हणत विदेशी आक्रमकांनी आपली कुटुंब व्यवस्था मोडण्यासाठी अनेक कपट केले. कुटुंब हे राष्ट्राचे शक्ती केंद्र आहे. कुटुंब व्यवस्था सुदृढ व्हावी यासाठी त्यांनी विविध उदाहरण दिले. या शिवाय नागरी कर्तव्याच्या भावनेत सजगता असली पाहिजे. असेही ते म्हणाले.