Breaking

Ravikant Tupkar : शेतकरी निघाले मुंबईला; अरबी समुद्रात सातबारे बुडवणार!

‘Chalo Mumbai’ protest for farmers’ loan waiver on March 19 : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘चलो मुंबई’ आंदोलन १९ मार्चला

Buldhana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पिकविमा, सोयाबीन कापूस भावफरक, रखडलेले अनुदान, उसाची एकरकमी एफ.आर.पी. अन्य मागण्यांसाठी बुलढाणा व आसपासचे शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ‘चलो मुंबई’ या आंदोलनामध्ये १९ मार्चला सर्व शेतकरी अरबी समुद्रात आपला सातबारा बुडवणार आहेत. तसेच कर्जमुक्ती झाल्याची घोषणाही स्वतःच करणार आहेत.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. कर्जाचे सातबारे अरबी समुद्रात बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा स्वतः शेतकरी करणार आहेत. तसेच सोयाबीन -कापूस अरबी समुद्रात टाकण्यात येणार आहे. १९ मार्चला मुंबईतील नरिमन पॉईंट येथे शेतकरी आपली मागणी मांडण्यासाठी एकत्र येणार आहेत.

MLA Siddharth Kharat on farmer suicide : युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येचे पडसाद विधानसभेत!

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी
2023-24 चा रखडलेला पिकविमा
विमा योजनेच्या अनियमिततेवर तोडगा
सोयाबीन-कापसाला प्रति क्विंटल 3 हजार रु.भावफरक मिळावा
जंगल जनावरांच्या त्रासावर कायमस्वरूपी उपाय
उसाची एकरकमी थकलेले एफआरपी देयके मिळावीत
नाफेडचे चुकारे, पूर्णवेळ वीज आणि दूध, कांदा आणि धानाला मदत

Ajit Pawar : २० टाळकी असताना पाठींबा कसला देताय ? दादांनी उडवली खिल्ली

आंदोलनाच्या पूर्वसंध्येला १८ मार्चला श्री क्षेत्र पंचायतन मंदिर, जे. एम. म्हात्रे इंग्लिश मिडियम स्कूल जवळ, जुना पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे, गाव – नढळ, खालापूर, पनवेल याठिकाणी शेतकरी मुक्काम करणार आहेत. शेतकऱ्यांचा हा लढा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ‘चलो मुंबई’ तसेच ‘अरबी समुद्रात सत्याग्रह’ आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.