Ravikant Tupkar said that the District Collector should explain to the nationalized banks : जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बॅंकांना समज द्यावी
Buldhana : सध्या राज्यभरातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात पिचल्या जात आहेत. अशातच आता राष्ट्रीयकृत बँकादेखील शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. या बँकांनी पिकविमा, अतिवृष्टी अनुदान, ठिंबक अनुदान व शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर कर्ज खात्यात वळती करण्याचा सपाटा लावला आहे. शेतकऱ्यांचे खाते होल्ड केल्या जात आहेत.
बॅंकांनी हे प्रकार कृपया हे थांबवाने, अन्यथा बँकांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्ट्रीयकृत बँकांना कडक समज देण्याची मागणी देखील तुपकरांनी केली आहे. यावर्षी खरिपात पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात घट झाली तर रब्बी मध्ये अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
Prataprao Jadhav, Ravikant Tupkar : सगळे म्हणतात आम्हीच सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न!
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोणत्याच शेतमालाला भाव नाही. भाव नसल्याने जिल्ह्यात ५०% पेक्षा जास्त शेतमाल हा शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अशातच आता येणारे पिकविमा, अतिवृष्टी अनुदान, ठिंबक अनुदान व शेतमाल विक्रीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. मात्र अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांच्या या रकमांना होल्ड लावत आहे.
Ravikant Tupkar : मुंबईत रविकांत तुपकरांसह शेकडो शेतकऱ्यांना अटक
चहुबाजूने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची बँक अधिकाऱ्यांकडून पिळवणूक होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. पिकविमा व अनुदानाच्या जमा होणाऱ्या रकमांना परस्पर होल्ड लाऊ नये किंवा सदर रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती करू नये, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. जर बँकांकडून असेच चालू राहिले तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकी आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभे राहतील.
Ravikant Tupkar : शेतकरी निघाले मुंबईला; अरबी समुद्रात सातबारे बुडवणार!
शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी, राष्ट्रीयकृत बँकांना कडक समज देण्याची आपल्या स्तरावरून तातडीने योग्य कार्यवाही करावी, अन्यथा संघर्ष होईल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन रविकांत तुपकरांनी बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांचे पिकविमा, अतिवृष्टी अनुदान, ठिंबक अनुदान व शेतमाल विक्रीचे पैसे परस्पर कर्ज खात्यात वळती केल्यास संबंधित बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करून बँक अधिकाऱ्यांना धडा शिकवल्या जाईल असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे.