Breaking

Sanjay Rathod : शासन आपल्या मोबाईलवर, काम होईल एका क्लिकवर!

Initiative will increase communication : अभियानावर पालकमंत्र्यांना दावा; सुसंवाद वाढण्याचा विश्वास

Yavatmal सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक, गतिमान सेवा देण्याचे शासनाने धोरण आहे. त्यासाठी शासनस्तरावरून वेगवेगळे कार्यक्रम देखील राबविले जातात. यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक व प्रशासनामध्ये सुसंवाद वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतूक देखील केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या उपक्रमाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, तहसिलदार आदित्य शेंडे व सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार ऑनलाईन उपस्थित होते.

Prataprao Jadhav, Sanjay Gayakwad : जाधव-गायकवाड जगदंबेच्या दर्शनाला!

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या मोबाईलवर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत प्रशासनाच्यावतीने यु-ट्यूब चॅनल तयार करण्यात आले आहे. या चॅनेलवर महसूल विभागाचे विविध विषय जसे, जमिनीची नोंदणी, फेरफार नोंदी, अकृषक परवानगी, विविध दाखले, वनहक्क कायदा, रस्ते संबंधी वाद, शिधापत्रिका, जमीन प्रकार, सातबारा, वारस नोंदी, भूसंपादन प्रक्रिया, मतदार नोंदणी प्रक्रिया अशा विविध विषयांची माहिती चॅनेलच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

पुढील टप्प्यात विविध शासकीय विभागाच्या योजना देखील उपलब्ध होणार आहे. संबंधित विषयाची सविस्तर माहिती उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी स्वत: व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. विषय समजून सांगतांना त्याचे बारकाने, नियम, अटी, दक्षता, काळजी यावर देखील माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घरबसल्या महसूलसह विविध विभागांच्या किचकट प्रक्रिया देखील नागरिकांना सोप्या भाषेत स्वत: अधिकाऱ्यांकडून माहिती होतील.

Mehkar Municipality : मेहकर पालिकेची अतिक्रमणविरोधी मोहिम तीव्र!

जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी काही दिवसात हा उपक्रम सुरु केला. जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक सेवा, पारदर्शक आणि गतिमानपणे मिळण्यासोबतच त्यांचा पैसा, वेळ आणि परिश्रम वाचविण्यासाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. वेळोवेळी उद्भवणारे विषय देखील या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. हा उपक्रम अतिशय चांगला असून सोप्या भाषेत नागरिकांना विविध योजना, उपक्रम आत्मसात होईल, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.