Breaking

Sanjay Rathod : पालकांच्या हातून मोबाईल सुटत नाही, मुलांचा काय दोष?

Not only children but parents should make habit of reading books : पालकमंत्र्यांचा पालकांनाही वाचन वाढविण्याचा सल्ला

Yavatmal आज घरोघरी मोबाईलमुळे वाचन कमी झाले आहे. यासाठी मुलांना दोष देऊन पालक सुटका करून घेऊ शकत नाही. आई-वडिलच तासंतास मोबाईलवर राहत असतील तर काय करणार? मुलांनी पुस्तक हातात घेऊन वाचन करावे, अशी अपेक्षा करू शकणार नाही. त्यामुळे पालकांनी देखील वाचन वाढवणे आवश्यक आहे, असा सल्ला पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला.

ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिकेच्या परिसरात आयोजित दोन दिवशीय यवतमाळ ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष प्रा.गजानन कोटेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय सहायक संचालक डॉ.राजेश पाटील उपस्थित होते.

Fair price shop : मोफत रेशन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई!

संजय राठोड म्हणाले, ‘अलिकडे वाचनाबाबत उदासीनता दिसून येत आहे. नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाचन संस्कृती वाढविण्यासोबतच ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करु.’ विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी. चांगली पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी. यासाठी ग्रंथोत्सव घेतला जातो. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व खुलते. जीवनाला सकारात्मक दिशा मिळते, असंही पालकमंत्री म्हणाले.

ग्रंथोत्सवामुळे विविध विषयांवरील पुस्तके कमी किमतीत आणि सहज मिळतील. शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालये या उपक्रमाचा लाभ घेऊन वाचन संस्कृतीला बळ देतील, हा विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

Indian Railway : लोकोपायलट म्हणतात, ‘आमच्या कामाते तास कमी करा’ : लोकोपायलट म्हणतात, ‘आमच्या कामाते तास कमी करा’

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.कोटेवार यांनी वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ग्रंथालय चळवळ जिवंत ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात ही चळवळ कायम ठेवण्यासाठी शासनमान्य ग्रंथालयांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ग्रंथालयांचे अनुदान, कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य समस्या यावेळी श्री.कोटेवार यांनी मांडल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.