MP Sanjay Raut slam bjp on bmc election : बीएमसी निवडणुकीवरून संजय राऊत यांनी भाजपला फटकारले
Mumbai: शरद पवरांनी पक्ष उभा केला तो आंदोलनातून. शिवसेनेसारखा पक्ष आंदोलनातून उभा राहिला, आम्हाला त्याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच आंदोलन झालं नसतं, तर आज अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले नसते असं सांगत खा. संजय राऊत यांनी बीएमसी निवडणुकीवरून भाजपला फटकारले आहे.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्याची आमची तयारी सुरु आहे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका आणि महाराष्ट्राच निवडणुका होतील. निवडणुका कोणाबरोबर लढायच्या याबद्दल पक्षामध्ये चर्चा सुरु आहे. निर्णय घेण्याचे अधिकारी पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिले आहेत.
Padalkar vs Jayant Patil : ‘दिवा विझताना मोठा होतो’ तसं जयंत पाटलांचं झालंय !
राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ते दोन वेगळे पक्ष आहेत. त्यांच्या पक्षांच्या मेळाव्यांवर त्यांनी मांडलेल्या भूमिकांवर आम्ही का मत व्यक्त करायचे. अजित पवार यांनी जी भूमिका मांडली, ती लोकशाहीत विरोधी पक्षाच जे स्थान आहे, त्याला छेद देणारी आहे. आम्ही विरोधी पक्षांनी आंदोलन केले नाही तर सत्ताधारी माजतील, राज्य, देश लुटतील महापालिका, जिल्हा परिषदा याच्यावर डाके टाकतील. जनतेच्या प्रश्नांना कोणी वाचा फोडणार नाही.
शरद पवरांनी पक्ष उभा केला तो आंदोलनातून. शिवसेनेसारखा पक्ष आंदोलनातून उभा राहिला, आम्हाला त्याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच आंदोलन झालं नसतं, तर आज अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले नसते. तुम्ही आंदोलनाचा अपमान करु नका. सत्तेत राहून लोकांची काम ऐकेकाळी करता येत होती. पण सत्ता आजकाल तिजोरी लुटायलाच वापरली जाते.
Liquor duty hike : गरिबांची देशी पोचली 80 वर, मद्यप्रेमींची चिंता वाढणार
गेल्या दहा वर्षात भाजपा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्रात आरोग्य, महसूल, शिक्षण असा एकही विभाग नाही की जिथे लुटमार केली नाही. जनतेचे कुठले प्रश्न मार्गी लावले हे नरेंद्र मोदी यांना विचारा. आज मजबूत सत्ता आहे. तरीही ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तान विरुद्ध दहशतवादा विरुद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला.
परदेशातून आलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळांची काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडे पंतप्रधानानी शरद पवारांच्या प्रकृतीविषयी चर्चा केली. यावर राऊत म्हणाले की, प्रकृतीविषयी चर्चा करणं याला स्नेह किंवा आदरभाव म्हणत नाहीत, तो शिष्टाचार आहे. पवारांचा इतका आदरभाव, शिष्टाचार असता, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रतिकुल परिस्थितीत ज्या पवारांनी मदत केली, त्यांचा पक्ष, घर अशा पद्धतीने फोडलं नसतं.
Ajit Pawar NCP : २५ हजार कार्यकर्ते राष्ट्रवादीत करणार प्रवेश
पवारसाहेबांची तब्येत उत्तम आहे. हे पंतप्रधानांना माहित असायला हवं. मी चौकशी केली. मी किती भावनाशील माणूस आहे, मला किती आदर आहे हे दाखवण्याचा प्रकार आहे. ज्या शिवसेनाप्रमुखांचा पक्ष फोडला, अधून-मधून भाषणातून त्यांचे गुणगान करतात. मी कसा शिवसेनाप्रमुखांचा भक्त आहे हे दाखवायचा प्रयत्न असतो. जर खोटारडेपणा, ढोंग यांना नोबेल पुरस्कार देण्याची वेळ आली, तर तो भाजप अध्यक्ष किंवा नरेंद्र मोदींना द्यावा लागेल अशी बोचरी टीकाही संजय राऊत यांनी केली.