Breaking

Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्वात मोठे ‘बोलबच्चन’

Sanjay Raut’s response to the Chief Minister :संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना जशास तसे प्रत्युत्तर

Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात मोठे ‘बोलबच्चन’ आहेत. असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी आज केला. ‘बोलबच्चन’ लोकांच्या वक्तव्यावर मी उत्तर देत नाही असे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. त्याला आता राऊत यांनी तशाच शब्दात उत्तर देत, विविध मुद्द्यांवर टीका केली आहे. शिवसेना राष्ट्रवादी का फुटली यावरही त्यांनी भाष्य केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री योग्य वेळी करणार असल्याचे म्हणाले होते. त्यावर राऊत म्हणाले, खरं तर मुख्यमंत्रीच सर्वात मोठे बोलबच्चन आहेत. हिंदीची सक्ती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर लादत आहेत. त्यांनी मराठी शाळा अधिक चांगल्या करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. ते म्हणाले, मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. हिंदी ही तिसरी भाषा म्हणून आम्हाला गरज नाही.

Crime news : नीट चाचणी परीक्षेत कमी गुण! मुख्याध्यापकान लेकीला बेदम मारून संपवलं

अनेक लेखक, कवी, अभिनेते हिंदी सक्तीच्या विरोधात पुरस्कार परत करत आहेत. त्यांचे मी अभिनंदन करतो. मनसेकडून या विषयावर आंदोलन सुरु झाले आहे. शिवसेना ठाकरे हा राज्यात प्रमुख पक्ष आहे. आम्ही विधानसभेच्या अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला जाब विचारु.संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवर वक्तव्य केले. दोन्ही पक्षांतील आमदारांना भय दाखवून फोडण्यात आले. तसेच प्रचंड पैशांचा वापर झाला. भय आणि भ्रष्टाचार यामुळे हे दोन्ही पक्ष फुटले, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीनंतर पक्षांतील बंड रोखले. तसेच २०२२ मधील शिवसेनेतील बंड रोखता आले असते, असे भास्कर जाधव म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, शरद पवार यांनी त्यावेळी बंड थांबवले. परंतु त्यानंतर चार वर्षांत अजित पवार गेलेच ना. उद्धव ठाकरे यांनीही बंड रोखण्याचा प्रयत्न केला. अनेक आमदारांशी चर्चा केली. परंतु काही जण घाबरुन गेले. भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील आणि शिवसेनेमधील आमदार गेले.

Iran- Israe War : युद्धामुळे पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दराचा भडका उडण्याचा धोका !

त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्या खात्यात ४० ते ५० कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे अटक होईल, अशी भीती त्यांना वाटली होती. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत निष्ठावंत आहेत. भास्कर जाधव यांच्या नाराजीवर संजय राऊत म्हणाले, भास्कर जाधव आमचे सहकारी आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या आहेत. त्यांची भूमिका मी माध्यमांमधून वाचली. त्यांच्या मनात काय वेदना आहे, ते आम्ही समजून घेऊ, असे संजय राऊत यांनी म्हटले.