Breaking

Sant Gajanan Maharaj : विदर्भातून संत परंपरेचा जयघोष!

Palkhi to depart from Shegaon for Pandharpur : शेगावहून श्रींच्या पालखीचे पंढरपूरसाठी उद्या प्रस्थान; ७०० वारकऱ्यांचा सहभाग

Shegao विदर्भाच्या संत परंपरेचा एक अनमोल सोहळा म्हणून ओळखली जाणारी श्रीसंत गजानन महाराज पालखी यात्रा उद्या (२ जून) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीसंत गजानन महाराज संस्थानच्या वतीने आयोजित होणारी ही वारी यंदा ५६व्या वर्षात पदार्पण करत आहे, हे विशेष.
राजकीयदृष्ट्या वारकऱ्यांचा वारीतील सहभाग केवळ धार्मिक आस्था नसून, जनमानसात असलेले त्यांचे व्यासपीठही मानले जाते. मागील अनेक वर्षांत अशा वारकऱ्यांच्या अनुशासनबद्ध सहभागामुळे सामाजिक बदल, स्वच्छता मोहिमा, व्यसनमुक्ती, आणि ग्रामविकासाचे संदेश प्रभावीपणे पोहोचवले गेले आहेत.

७०० वारकऱ्यांचा भक्तिमार्गाने सहभाग
ज्येष्ठ शुद्ध सप्तमी, म्हणजेच उद्या सकाळी ७ वाजता श्रींच्या पालखीचे विधीवत पूजन होऊन प्रस्थान होणार आहे. टाळ-मृदंगाच्या निनादात, हरीनामाच्या गजरात, भगव्या पताका फडकावत सातशेहून अधिक वारकरी ‘जय हरी विठ्ठल’चा घोष करीत पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत.

Vidarbha farmers : अनुदानित बियाणांना हजारो शेतकरी मुकणार!

‘विदर्भाचे पंढरपूर’ म्हणून शेगावचा गौरव
श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यवस्तव्यामुळे शेगाव ही नगरी विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखली जाते. या वारकरी चळवळीचा प्रभाव स्थानिक सामाजिक-राजकीय पातळीवरही जाणवतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकसहभाग आणि जनतेशी थेट संवाद साधण्याचे हे एक प्रभावी व्यासपीठ मानले जाते.

वारकऱ्यांच्या आस्थेचा आणि श्रमांचा राजकीय भान ठेवावा – जाणकारांचे मत
वारकरी चळवळीतील स्वच्छतेचा आग्रह, शिस्तबद्ध चाल, आणि सामाजिक विषयांवरील जागृती यामुळे या चळवळीचा वापर राजकीय प्रचारासाठी न होता समाजहितासाठी होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यातील सर्वच पक्षांनी यापूर्वी वारकऱ्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे उपक्रम राबवले आहेत, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

Chandrashekhar Bawankule : पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध

पंढरपूर यात्रेच्या दिशेने एक पवित्र वाटचाल
चार मुख्य एकादशींपैकी आषाढी एकादशीसाठी ही वारी होत असून, संतपरंपरेचा वारसा जपणाऱ्या या परंपरेतून शेगावची वारी एक आदर्श ठरते. समाजात समरसतेचा संदेश देणारी, अनुशासनाचे भान देणारी ही यात्रा आता नव्या पिढीला आणि बदलत्या समाजमनाला प्रेरणा देत आहे.