Satej Patil and Vishwajit Kadam absent from oath-taking ceremony : महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांना जुन्या वैभवाची आस, हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
Mumbai : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पदग्रहण समारंभाला काँग्रेसचे तीन वरिष्ठ नेते अनुपस्थित राहिले. यात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. काँग्रेसला जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी सर्वच वक्त्यांनी केले.
मावळते अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून हर्षवर्धन सपकाळ यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. परंतु ज्यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. यात सतेज पाटील व विश्वजीत कदम यांचे नावांचा समावेश होता. परंतु या दोन्ही नेत्यांनी या पदग्रहण समारंभाला हजेरी लावली नाही. काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने हे दोन्ही नेते उपस्थित राहू शकले नाही. संतेज पाटील यांचे बंधूंच्या एकषष्ठीचा कार्यक्रम असल्याने ते येऊ शकले नाही तर विश्वजीत कदम यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही, असे प्रदेश काँग्रेस समितीने स्पष्ट केले आहे. अनुपस्थित राहिलेले तिन्ही नेते हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत.
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : कर्जमाफी न केल्यास विधानसभेवर ट्रॅक्टर मोर्चा
वैनगंगा व पैनगंगेचा हा संगम..
नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस म्हणजे वैनगंगा व पैनगंगेचा संगम असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सपकाळ हे बुलडाणा जिल्ह्यातील असून या जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहते तर चंद्रपूर जिल्ह्यातील असलेले विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातून वैनगंगा नदी वाहत असल्याने या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात पैनगंगा व वैनगंगेच्या संगमातून काँग्रेसला नवी उभारी मिळेल, अशा आशावाद यावेळी अनेक वक्त्त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, खासदार प्रणिती शिंदे, खासदार चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आमदार अमित देशमुख, बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते.
Amravati District : ७२२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण बदलणार !
नाना पटोलेंच्या कार्याचा गौरव..
मावळते अध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्याचा सर्वच वक्त्यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला चांगले यश मिळवून दिले परंतु विधानसभेत मात्र भाजपच्या व निवडणूक आयोगाच्या कृत्यामुळे काँग्रेसला यश मिळू शकले नाही, असेही यावेळी दावा करण्यात आला.