Breaking

School Education : विद्यार्थ्यांनीच केली स्वतःच्या स्वागताची तयारी!

The students themselves worked for their own welcome on first day of school : शिक्षण खात्याचे ‘अजब’ नियोजन; विद्यार्थ्यांकडून करून घेतली कामे

Buldhana शालेय जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील पाया असून त्याच पायावर पुढील वाटचाल ठरते, असे उद्गार राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढले. मात्र, त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमातच शिक्षण विभागाच्या गोंधळलेल्या नियोजनाची झलक पहायला मिळाली. बुलढाणा जिल्ह्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी त्यांच्याचकडून करून घेण्यात आली. शाळा व्यवस्थापनाच्या या अजब नियोजनाची सध्या जोरदार चर्चा आहे.

तालुक्यातील सिंगाव जहांगीर येथे मंत्री दादा भुसे शालेय पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी शालेय जीवनातील अनुभव, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे महत्त्व, मोबाईलपासून दूर राहून अध्ययनावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यांनी आपल्या नातीचे उदाहरण देत सध्याच्या मोबाईल युगातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष वेधले.

School opening: विदर्भातील बहुतांश शाळांमध्ये पहिल्याच दिवशी शुकशुकाट

पण, कार्यक्रमाच्या मागचं वास्तव काय?
मंत्री येणार म्हणून दोन दिवस आधीपासून शासकीय यंत्रणा हलत्या झाल्या होत्या. मात्र कार्यक्रमस्थळी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच विद्यार्थ्यांना झाडझुडपं तोडणे, पाणी आणणे, स्वच्छतेची कामे करण्यास लावण्यात आल्याचे चित्र दिसले. मीडियाने याबाबत प्रश्न विचारल्यावर, “विद्यार्थी स्वयंस्फूर्ततेने करत आहेत,” असा बचाव करण्यात आला.

मात्र, या वयाच्या विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारे कामे लावल्याचे पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. या प्रकारावर शिक्षणमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पण प्रश्न राहतो – प्रत्येक वेळी कार्यक्रमाच्या वेळीच प्रशासनाला जाग येणार का?

Chandrashekhar Bawankule : नागरिकांचे मुलभूत प्रश्न तात्काळ मार्गी लावा; अधिकाऱ्यांना कानपिचक्या

स्वागत की दिखावा?
कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते दप्तर, शालेय गणवेश व पुस्तके वितरित करण्यात आली. मात्र वाटप करण्यात आलेल्या दप्तर व गणवेशाचा खालावलेला दर्जा लक्षात घेता गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. नेहमीप्रमाणे आश्वासनांचा पाढा वाचण्यात आला, पण नव्या कोणत्याच निर्णयाची घोषणा झाली नाही.