Breaking

Sharad Pawar: तर…. ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला

Government praised for AI policy adopted for agriculture :शेतीसाठी स्वीकारलेल्या ए आय धोरणावर सरकारचे केले कौतुक

Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि या पक्षातून बाहेर पडलेले अजित पवार हे दोन्ही गट पुन्हा एकत्र यांना येणार अशी काही दिवसापासून चर्चा होती काका पुतण्यांच्या काही भेटीगाठी झाल्याने याकडे कार्यकर्ते अशाने पाहत होते मात्र शरद पवारांनी एका कार्यक्रमात अजित पवार किंवा भाजपसोबत जाणार नाही असे सांगत चर्चांना विराम दिला दरम्यान बारामती जिल्ह्यात सुरू असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे या संदर्भात बोलताना त्यांनी पुतण्या अजित पवारांना उद्देशून म्हणले आहे की, लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे पवार काका-पुतणे पुन्हा आमनेसामने आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, शरद पवार यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात आपल्याला अजित पवार किंवा भाजप यांच्यासोबत जायचे नसल्याचा स्पष्ट संदेशbकार्यकर्त्यांना दिला. या सगळ्यामागे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील घडामोडी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

Monsoon Alart : राज्यात पुढीलं 5 दिवस पावसाचे, काही भागात ऑरेंज ‘अलर्ट’

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी मालेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेविषयी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं हे झालं, असे शरद पवार यांनी म्हटले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हा स्थानिक प्रश्न आहे. आजुबाजूला जे तालुके आहेत, त्यांचे लक्ष इथे नाही. माळेगाव सहकारी साखर कारखाना माझ्या नावाने ओळखला जातो. या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती, आजही नाही. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं ते झालं.

PM Modi & Trump Talk : भारत मध्यस्थी मान्य करत नाही,ऑपरेशन सिंदूर सुरुच राहील

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमतेच्या वापराबाबत निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे हित साधले जाईल, असा आशावाद शरद पवारांनी व्यक्त केला. Al बाबत वर्कशॉप आहेत. माझं तिकडे लक्ष आहे. महाराष्ट्र सरकारने काल 500 कोटीचा निर्णय घेतला आहे. ऊस आणि बाकीचे पिके वापरण्याचे धोरण फायनल केलं. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंद करतो. त्यांनी निर्णय करण्याचे धाडस दाखवलं. देशात पहिलं राज्य आहे की एआय स्वीकारत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.