Sudhanshu Maharaj appreciated the PM Modi : नागपुरात उभारणार विश्व जागृती मिशनचे भव्य गुरुकुल
Nagpur विश्व जागृती मिशनचे आचार्य सुधांशूजी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. सोबतच त्यांच्या पुढाकारातून नागपुरात भव्य गुरुकुल उभारण्यात येणार आहे. विश्व जागृती मिशनच्या रौप्यमहोत्सवी महोत्सवानिमित्त ते नागपुरात आले आहेत. रेशीमबाग येथे १२ जानेवारीपर्यंत त्यांचा सत्संग चालणार आहे.
यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका मांडली. जर एखाद्या धर्मामुळे वाईट वर्तन होऊ शकते, तर तुम्ही धर्माच्या नावावर स्वतःला बळकट करू शकता. सर्वोत्तम बनू शकता. आज एक सनातनी व्यक्ती हिंदू समाज आणि देशाला पुढे नेण्याचे कार्य करीत असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले.
Dr. Pankaj Bhoyar : राज्यमंत्र्यांनी दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य
बांगलादेशात जे घडले ते अत्यंत रानटीपणाचे उदाहरण आहे. दोन लाख लोकांना पोट भरणाऱ्या इस्कॉनवाल्यांना पकडून मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोनाच्या काळात या इस्कॉनने तेथील लोकांना जेवण दिले. सत्ता तुमच्या पाठीशी आली तर संधी मिळते. तिथल्या लोकांची मूल्ये गेली कुठे? ही गोष्ट लोकांच्या मनात नक्कीच येत आहे, असे ते म्हणाले.
विश्व जागृती मिशनतर्फे नागपुरात भव्य गुरुकुलाची स्थापना करण्यात येत आहे. मिशनच्या रौप्य महोत्सवी महोत्सवाच्या निमित्ताने समाजाच्या हिताचे हे उदात्त कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आधुनिक शिक्षणासोबतच येथे पुराणांचे शिक्षणही दिले जाणार आहे. सीबीएसई बोर्डाचे शिक्षण येथे दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
घरोघरी व्हावे गीतेचे पठन
प्रत्येकाला आपला धर्म, सनातन संस्कृतीचे ज्ञान व धर्माप्रति निष्ठा असलीच पाहिजे. त्यासाठी समाजामध्ये भगवद् गीता, रामायण ग्रंथाचे पठन व्हायलाच पाहिजे. भगवंताची अमृतवाणी भगवद् गीता आहे. गीतेमधील संदेश आमपल्या समाजाने जीवनात उतरवायला हवा. यामध्ये सर्वांचे कल्याण होईल हे निश्चित आहे. आम्हाला श्रीकृष्णाने शिकविलेली धोरणे जीवनात उतरविणे गरजेचे आहे. श्रीकृष्णाचे चरित्र, त्यांचे जीवन, आमच्या जीवनपथाला प्रभावित करते, असा विचारही सुधांशू महाराजांनी मांडला.