Breaking

Sudhir Mungantiwar : 66 वर्षांच्या तुलनेत 11 वर्षांत 5 पट अर्थसंकल्पीय वाढ

 

Free food to 81 crore, loans to 52 crore, Rs 3.7 lakh crore to farmers, free treatment 9 crore : मोदी सरकारचा महास्पर्श : 81 कोटींना मोफत धान्य, 52 कोटींना कर्ज, 9 कोटी रुग्णांवर मोफत उपचार!

Chandrapur: देशाचे 66 वर्षे जे बजेट होते ते गेल्या 11 वर्षात 5 पट वाढले ही देशासाठी प्रगतीची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या 11 वर्षात 81 कोटी जनतेला मोफत धान्य वितरन केले जात आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून 52 कोटी रुपयांचे कर्ज छोट्या व्यावसायिकांना उपलब्ध केले आहे. 3.7 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सन्मान निधी पाठवला आहे. तसेच 9 कोटी रुग्णांना मोफत उपचार केले आहेत अशी माहिती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. यावेळी त्यांनी सरकारच्या योजनाची सविस्तर माहिती दिली.

सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जनतेने जो आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाचे सोनं करण्याचा प्रयत्न या 11 वर्षांमध्ये देशगौरव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रसरकारने केला. जनतेने ज्या विश्वासाने मतदान केले. त्याला अनुसरूनच सरकारचं कार्य सुरू आहे. भाजप आणि मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या काळातील प्रमुख बाबींचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, कोरोना काळात अगदी मोफत मध्ये वॅक्सिंग उपलब्ध करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला.

Sudhir Mungantiwar : छोट्या व्यावसायिकांना मिळाला मुनगंटीवारांचा आधार!

भारताच्या ज्या मतदारांनी मोदीजींवर विश्वास व्यक्त केला आणि 24 कोटी मतदारांनी जून 2024 च्या निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिला. या सरकारच्या वतीने गरिबांसाठी मदत केली जाते. 80 कोटी मोफत धान्यवरून आता आपण 81 कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य देतोय. त्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत जो कर्ज पुरवठा आहे तो 68 लक्ष पेक्षा जास्त आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून 52.5 कोटी छोट्या व्यावसायिकांना कर्ज पुरवठा केला. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला ओबीसी समाजाच्या मागणीनुसार संविधानिक दर्जा दिला.

मोदींनी क्रांतिकारी निर्णय घेतल्यामुळे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर पद्धतीमुळे लाभार्थ्यांच्या खातात थेट पैसे मिळतात. या माध्यमातून गोरगरीब, वंचित, शेतकरी यांच्या खात्यात 11 वर्षांमध्ये 44 लक्ष कोटी रुपये पोहोचवले आहेत. मोदीजी येण्याच्या अगोदर या देशात दोन कोटीच्या आसपास घरांपर्यंतच शुद्ध जल जात होतं. ते आता ‘ हर घर जल ‘ च्या माध्यमातून 15 कोटी घरापर्यंत पोहोचलं आणि संकल्प आहे की प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचावं. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून चार कोटी घरं आतापर्यंत बांधून पूर्ण झाली आहेत.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा पुढाकार अन् चंद्रपूर होणार Honey Hub!

शेती आणि शेतकरी क्षेत्रासाठी जे बजेट होतं ते 66 वर्षाचा बजेट पेक्षा पाच पट वाढ झाली म्हणजे एकीकडे 66 वर्ष आणि दुसरीकडे 11 वर्ष . किसान सन्मान निधी म्हणजे शेतकऱ्यांना जे सहा हजार रुपये दिले जातात आत्तापर्यंत 3.7 लक्ष कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. किसान क्रेडिट योजनेमध्ये तीन लाखावरून मर्यादा वाढवली. पिक विमा योजनेमध्ये तर अकरा वर्षांमध्ये क्रांतीकारी मदत केली. 1.75 लक्ष कोटी हे नुकसान भरपाईच्या माध्यमातून मदत केली. स्वातंत्र्यानंतरचे 66 वर्ष एकीकडे आणि अकरा वर्ष एकीकडे आहेत.

देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आता 2 हजार 45 वर पोहोचली, पंतप्रधान कौशल्य विकास योजनेत 1 कोटी 60 लक्ष युवकांना प्रशिक्षण दिले हा सगळ्यांसाठी अभिमानाचा विषय आहे. चंद्रावर अनेक देशाचे यान गेलेले आहेत. दक्षिण ध्रुवावर पहिलं पाऊल टाकणारा भारत पहिला देश ठरला. मातृवंदन योजनेअंतर्गत 3.98 कोटी गर्भवती महिलांना अर्थसाह्य केलं. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 4.2 कोटी मुलींची बँक खाते उघडली गेली. अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

Sudhir Mungantiwar : शिवस्मरणातून आ. सुधीर मुनगंटीवार यांची सांस्कृतिक सिंहगर्जना

उज्वला योजनेत 10.33 कोटी महिलांची स्वयंपाक घरातील धुरापासून मुक्ती देण्यासाठी मोठा निर्णय ठरला. पंतप्रधान आवास योजनेमध्ये जी घर दिली त्यामध्ये वैशिष्ट्य होतं की घराची मालकी
महिलांनाही दिली. साधारणता 90 लक्ष बचत गट देशामध्ये काम करत आहेत. हा महिलांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय ठरला. गेल्या अर्थसंकल्पामध्ये करमुक्त उत्पन्न हे आता वाढवलं आता ते 12 लक्ष पर्यंत करमुक्त उत्पन्न आहे. 77 कोटी जनतेने आयुष्यमान भारत योजना अकाउंट तयार केले. 9 कोटीं रुग्णांनी आयुष्यमान भारत योजनेमध्ये मोफत उपचार घेतले आहेत. 50 ते 90% दराने कमी दराने औषध प्राप्त होतील असे सोळा हजार जनरीक औषधी केंद्र तयार केले आहेत.

Chandrapur : मुनगंटीवारांनी घेतला विसापूर येथील निर्माणाधीन एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा !

सर्वात जास्त इम्पोर्ट आपल्याला डिफेन्स मध्ये आणि क्रूड ऑइल मध्ये केल्या जायचं आता डिफेन्स मध्ये आपण एक्स्पोर्ट करायला लागलो आहोत. मागच्या वर्षी आपण 23 हजार 622 कोटी रुपयांचे एक्सपोर्ट हे डिफेन्स मध्ये केले. रस्त्याच्या बाबतीत आकडेवारी देण्याची आवश्यकताच नाही कारण तुम्ही कुठेही प्रवास करा देशभर उत्तम रस्ते तयार झाले आहे, जनतेचा आशीर्वाद असाच राहिला तर अमेरिकेपेक्षाही पुढे जाऊ. मेट्रोमध्ये आपण पुढे गेलो. वंदे भारत ट्रेन वाढत आहेत. असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.