Grand Shri Ram story conceived by Sudhir Mungantiwar concludes with a grand aarti :
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील भव्य श्रीरामकथेचा महाआरतीने दिमाखदार समारोप
Chandrapur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार \ सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून लखमापूर धाम, चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित भव्य श्रीरामकथेचा आज, गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी महाआरतीने भावपूर्ण आणि दिमाखदार समारोप झाला. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या अध्यात्मिक ज्ञानयज्ञाने चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भाचे वातावरण राममय केले होते.
मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या या श्रीरामकथेमध्ये दररोज हजारो भाविकांनी उपस्थिती लावून कथाश्रवणाचा लाभ घेतला. पूज्य राजन महाराज यांच्या ओजस्वी, रसाळ व अमृतमय वाणीने श्रीरामांच्या जीवनातील आदर्श, त्याग, कर्तव्य आणि करुणेचे संदेश जनमानसात खोलवर रुजवले. रामनामाच्या घोषात, भक्तिरसात चिंब न्हालेल्या या सोहळ्याने समाजमनाला नवसंस्कारांची दिशा दिली.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले निवडणूक प्रक्रियेत क्रांतिकारी बदल आवश्यक
“रामकथा ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाला एकत्र बांधणारी मूल्यव्यवस्था आहे,” हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा विचार या आयोजनातून प्रत्यक्ष साकार झाला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवा जपण्याचा त्यांचा दृष्टिकोन या उपक्रमातून ठळकपणे दिसून आला. विशेष म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार हे सपत्नीक दररोज कथेला उपस्थित राहून भाविकांमध्ये प्रेरणा निर्माण करत होते.
समारोपप्रसंगी झालेल्या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारावून गेला. विविध समाजघटक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत केलेली आरती ही सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरली. भव्य व्यासपीठ, शिस्तबद्ध नियोजन आणि मनोहारी विद्युत रोषणाईमुळे चांदा क्लब ग्राऊंडवर खऱ्या अर्थाने दिव्य व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या अलीची गुजरात येथे अखिल भारतीय सागरी जलतरणात झेप
विशेष बाब म्हणजे या श्रीरामकथेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू असल्याने राज्यभरातील रामभक्तांना घरबसल्या पूज्य राजन महाराज यांच्या अमृतवाणीचा लाभ मिळाला. त्यामुळे चंद्रपूरची ही रामकथा केवळ स्थानिक मर्यादेत न राहता राज्यव्यापी आध्यात्मिक उत्सव ठरली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य श्रीरामकथेमुळे चंद्रपूरच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणारे पर्व जोडले गेले असून, हा भक्तिरसाचा प्रवाह दीर्घकाळ जनमानसात प्रेरणा देत राहील, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला.
__








