Breaking

Sudhir Mungantiwar : संविधानाची ताकद म्हणजे संधीची समानता !

 

MLA Sudhir Mungantiwar elaborated on the importance of the Constitution : १०० वर्षात महाराष्ट्र कसा असेल, याचे नियोजन गरजेचे

Mumbai : आपल्या देशात चहा विकणारा गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान होतो. तर ठाण्यात ऑटो चालवणारा मुख्यमंत्री होतो. नागपुरातील महालमध्ये लुनावर फिरणारा व्यक्ती कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत असे रस्ते तयार करतो की ज्यावर विमानही उतरू शकेल. ही भारताच्या संविधानाची ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

‘संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’, या विषयावर आज (२६ मार्च) विधीमंडळ सभागृहात आमदार मुनगंटीवार बोलत होते. संविधानाच्या वास्तव स्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, काही लोक संविधानाचा अर्थ आपाआपल्या फायद्यासाठी लावतात. एकमेकांना दोष देऊन संविधानाच्या चौकटीत देश पुढे जाऊ शकणार नाही. १०० वर्षात महाराष्ट्र कसा असेल, याच्या संदर्भात दिशा देणारे नियोजन केले पाहिजे. १०० वर्षांनी आपण नसू, पण तेव्हा ‘मोबाईल स्मार्ट होते, पण आमदार स्मार्ट नव्हते’, असे तेव्हाच्या आमदारांनी म्हणू नये, असे आपले वर्तन असावे.

‘संविधान भक्ती न हो क्षणिक ऊबाल, मन मे पले वह पुरे साल’, आपली कृती त्या दिशेने होत नसेल, तर संविधान अर्पण करणाऱ्यांच्या मनात जो भाव होता, तो साध्य होणार नाही. संविधान म्हणजे केवळ शब्दांचा समुच्चय नाही. तर संविधानात समाजाला एक करण्याची क्षमता आहे. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छपर्यंत भारत विश्वगौरव व्हावा, हा संविधानाच्या प्रत्येक शब्दाचा आशय आहे, असे आमदार मुनगंटीवार यांनी नमूद केले.

Sudhir Mungantiwar : आधी २०२ कोटींचा विक्रमी पिक विमा अन् आता मिळवून दिला धानाचा बोनस !

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य रयतेचं राज्य होतं. तो लोकशाहीचा समानार्थी शब्द आहे. अन् हेच संविधान आहे. संविधान बदलण्याचा नाही तर जगण्याचा विषय आहे. आपल्या २८८ सदस्यांपैकी कुणीही स्वातंत्र्य संग्रामात सामील झाले नव्हते. पण आता अशी कोणतीही कृती होऊ नये, की जी संविधानाच्या विरोधात होईल. भारत हा लोकशाहीचा जनक आहे.

‘पाचामुखी परमेश्वर’, हा शब्द सहज आलेला नाही. तर पूर्वी पाच पंच मिळून जो निर्णय द्यायचे, तो सर्वमान्य असायचा. त्यामुळे या चर्चेतून जे काही मुद्दे येतील, त्याचे डॉक्युमेंटेशन करणे गरजेचे आहे. ज्या दिवशी संविधानाचे १०० वर्ष पूर्ण होतील, त्या दिवशी माझा महाराष्ट्र कुठे असेल, हा खरा प्रश्न आहे. संविधानाच्या चौकटीतील प्रगती काय असेल, दिशा काय असेल, साधनं काय असतील, याचा विचार करणे गरजेचे असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar : क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव एकमताने संमत

संविधानाला एक हजार वर्ष कुणीही बदलू शकणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीच्या बैठकीत म्हणाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत ‘संविधान बदलणार आहे’, अशी अफवा पसरविण्यात आली. त्याचा त्यांना काही
प्रमाणात फायदाही झाला. पण ते जनतेला नंतर लक्षात आले.
‘झुठे इन्सान की ऊंची आवाज सच्चे इंसान को खामोश करा देती है,
मगर सच्चे इन्सान की खामोशी झुठे इन्सान की दुनिया जला देती है’,
हा  शेर म्हणत आमदार मुनगंटीवार यांनी काँग्रेसला टोला लगावला. लोकसभेत ते खोटं बोलले, विधानसभेत त्याचं उत्तर लोकांनी दिलं. लोकसभेत आम्ही शांत राहिलो. तर विधानसभेत आम्हाला जनतेनं भरभरून कौल दिला, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आपलं संविधान म्हणजे जगातली सर्वात शक्तीशाली आणि मोठी घटना आहे. पण आपली कृती त्या दिशेने नेण्याची गरज आहे. आपल्याला तिसऱ्या इकॉनॉमीमध्ये यायचं असेल तर काही बदल केले पाहिजे. जापानसारखा देश पुढे जातो. भुकंप, त्सुनामी येतात, तरीही ते डगमगत नाहीत. ते देशासाठी जगतात. जे काही करायचे ते देशासाठी करायचे, असा त्यांनी मॉरल एज्युकेशनचा अर्थ काढला. महाराष्ट्रात मॉरल एज्युकेशन द्यावं लागेल.

Sudhir Mungantiwar : आपल्या मनातील राम-रावणाच्या युद्धात रामच जिंकावा, ही गायत्री परिवाराची शिकवण !

आपण समानतेचा अर्थ मान्य केला पाहिजे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ मान्य केला पाहिजे. लोकशाही ही संस्कारीत अन् संयमी मार्गाने पुढे गेली पाहिजे. स्वैराचारी मार्गाने जाता कामा नये. संविधानात नागरिकांचे मुलभूत कर्तव्य, सरकारची कर्तव्ये सांगितली आहेत. संविधानाचा गौरव करत असताना सर्वात सहनशील समाज भारतात आहे. त्यामुळे आपली गती कमी असता कामा नये. देशात जनगणना होईल तेव्हा त्यातील ‘गरीब’ हा कॉलम निघून जाईल, तेव्हा संविधानाचा खरा गौरव होईल, असे आमदार मुनगंटीवार यांनी सभागृहाला सांगितले.

शेवटी खालील कविता सादर करून त्यांनी ‘संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावरील भाषण संपवले…

‘लोहा जितना तपता है, उतनीही ताकद भरता है..
सोने को जितनी आग लगे, उतनाही प्रखर निखरता है..
सुरज जैसा बनना है, तो सुरज जैसा जलना होगा..
नदीयो सा आदर पाना है, तो पर्वत छोड निकलना होगा..
अगर हम भारत मॉं के बेटे है, तो क्यो सोचे राह सरल होगी..
हर संकट का हल होगा, आज नही तो कल होगा.. आज नहीं तो कल होगा..