Sudhir Mungantiwar provided market committee for sale of farm produce : शेतकरी आणि किसान मोर्चाने केले स्वागत
Chandrapur : कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्व शेतकऱ्यांसाठी मोठे आहे. शेती उत्पादनांच्या खरेदी विक्री प्रक्रियेत बाजार समिती बाजारपेठेचे नियमन करते. राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यात बाजार समिती निर्माण करण्याची घोषणा अलीकडेच केली. परंतु राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी बाजार समिती स्थापन करण्यासाठी यापूर्वीच प्रयत्न केले आणि आज शेतकऱ्यांना बल्लारपूर येथे शेतमाल विकण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर तालुका निर्माण झाल्यानंतर तब्बल २६ वर्षांनंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समिती मिळाली आहे. यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हा स्तरापासून ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि बाजार समितीची स्थापना झाली. शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा जनतेने गौरव केला. तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव आणि किसान मोर्चाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला.
Sudhir Mungantiwar Meets Nitin Gadkari : मुनगंटीवारांनी मागणी केली, गडकरींची ‘ऑन दि स्पॉट’ मंजुरी!
किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, बल्लारपूर तालुक्याचे अध्यक्ष अनिल मोरे. किसान युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नरेंद्र आमने, राजू बुद्दलवार, धनराज कोवे, भालचंद्र वडस्कर, रवी गेडाम यांनी एक समारंभ आयोजित करून शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल आमदार मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. बल्लारपूर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरेल. शेतमालाला योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचे शोषण आता होणार नाही, असे आमदार मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
Sudhir Mungantiwar : बाबूपेठवासीयांसाठी नवीन पूल ठरणार चंद्रपूरशी मने जोडणारा दुवा!
बल्लारपूर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना होण्यापूर्वी व्यापारी शेतकऱ्यांकडून थेट शेतीमालाची खरेदी करत होते. व्यापारी हवे तसे दर ठरवत होते. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत होती. पण आता बाजार समितीच्या स्थापनेमुळे शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण मिळणार आहे. व्यापारी, अडते, तोलाई यांना बाजार समितीमध्ये परवाने देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. बाजार समितीमध्ये स्पर्धात्मक बोली लावली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. बाजार समितीच्या कामकाजावर निवडून आलेले संचालक यांचे नियंत्रण असते.
शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या या निर्णयामुळे बल्लारपूर तालुका कृषी क्षेत्रात अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.