What will happen in the election of Shirdi Sai Sansthan? : शिर्डी साई संस्थानच्या विश्वस्थ मंडळाच्या निवडीत काय होणार ?
Nagpur : २०२४ची विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर मंत्रीमंडळ गठणाच्या वेळी नगर जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे नाव मंत्रीपदासाठी जवळपास निश्चित झाले होते. पण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नगर जिल्ह्याला मंत्रीपदाची गरज नाही, असे सांगून जगतापांचा पत्ता कट केला होता. ही बाब तटकरेंनी प्रतिष्ठेची केली होती, असे सूत्र सांगतात. तेव्हा नगर जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते नाराज झाले होते. नंतर अजित दादा आणि संग्राम जगतापांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.
विधान परिषदेची निवडणूक लागली तेव्हा अजित पवार पक्षाकडून शिर्डीचे संग्राम कोते पाटील यांचे नाव निश्चित झालेच होते. पण शेवटच्या क्षणी त्यांना डावलून अमरावतीचे संजय खोडके यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली. त्यांची पत्नी सुलभा खोडके अमरावती विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. त्यामुळे एकाच घरात दोन आमदार कशाला, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. पण याही वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही गोष्ट प्रतिष्ठेची केली आणि संग्राम कोते पाटलांचे नाव मागे घेण्यास पक्ष प्रमुखांना भाग पाडल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे तटकरेंना ‘संग्राम’ या नावाची अॅलर्जी आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
Raj and Uddhav Thackeray : अस्तित्व टिकवायसाठी एकत्र यावंच लागेल, शत्रुचा शत्रू मित्र !
आता शिर्डी साई संस्थानच्या विश्वस्थ मंडळ निवडले जाणार आहे. संस्थानच्या अध्यक्षपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्याकडून डावलले गेलेले संग्राम कोते पाटील संस्थानच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. संग्राम कोते मुळचे शिर्डीचे आहेत. तेथील भौगोलिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीचा त्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे संस्थानच्या अध्यक्षपदी त्यांचीच निवड व्हावी, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. पण याही वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संग्राम कोते पाटील यांचा ‘गेम’ तर करणार नाही ना, अशी भीती कार्यकर्त्यांच्या मनांत आहे.
C. P. Radhakrishnan : आपल्या विद्यार्थ्यांनी किमान एक तरी जागतिक भाषा शिकावी !
शिर्डी साई संस्थानकडे ३००० कोटींच्या ठेवी आहेत. तर आंदाजे १००० किलो चांदी आणि सोने आहे. सहा हजार कर्मचारी कार्यरत आहेत. दक्षिणेतील तिरूपती देवस्थानानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शिर्डी देवस्थान मानले जाते. संस्थानवर विश्वस्थ मंडळ नसल्यामुळे भक्तांना सुविधा देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवाय संस्थानासह शहराचा विकासही खुंटला आहे. गेल्या १४ वर्षात सुरेश आवरेंचा तीन वर्षांचा कालावधी सोडला तर कोणत्याही विश्वस्थ मंडळाने तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. त्यामुळे कोणतेही विकासात्मक निर्णय होत नाहीयेत.
शिर्डी संस्थानच्या विश्वस्थांच्या संदर्भातील काही बाबी न्यायप्रविष्ठ होत्या. पण आता अनेक कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या. त्यामुळे विश्वस्थ मंडळाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत अध्यक्षपदी सुजय विखे पाटील, स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे आणि संग्राम कोते पाटील या चौघांपैकी कुणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.