Breaking

Tamaswada Pattern : कमी खर्चात जलसंवर्धन; तामसवाडा पॅटर्न आता राज्यभर!

Low-cost water conservation methods to be implemented across the state : नितीन गडकरींच्या मार्गदर्शनात पूर्ण झाला प्रकल्प

Wardha वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे (पाटील) यांनी जिल्ह्यातील तामसवाडा प्रकल्पाला भेट देत पाहणी केली. या प्रकल्पामुळे अत्यंत कमी खर्चात पाणी संवर्धन करण्यात येत आहे. यामुळे शेती व अन्य कार्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे. या प्रकल्पाची प्रशंसा करीत हा प्रकल्प राज्यभर राबविण्याचे आश्वासन यावेळी नीलेश हेलोंडे Nilesh Helonde यांनी दिले.

प्रकल्पाचे काम २०१० मध्ये सुरू झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांच्या प्रेरणेने व त्यांच्याच मार्गदर्शनात तामसवाडा प्रकल्प २०१२ मध्ये पूर्ण झाला. २०१८ मध्ये भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व केंद्रीय भूजल सर्वेक्षण बोर्डाने तामसवाडा पॅटर्नला टीपी म्हणून घोषित केले.

Wardha Zilla Parishad : आरोग्य सेवक भरती रखडली, प्रशासनाविरुध्द रोष

विदर्भाची पाणी समस्या लक्षात घेता तामसवाडा पॅटर्ननुसार कार्य केल्यास ८० टक्के कोरडवाहू क्षेत्र दुष्काळमुक्त तयार करणे शक्य आहे. पाणी कमी होत असल्याने हाती आलेले पीक नष्ट होते. परंतु, प्रकल्पाच्या माध्यमातून भूजलाचे समृद्ध जल भंडारण तयार करणे व सिंचनासाठी पाणी संरक्षित करणे शक्य होते. तामसवाडा पॅटर्नमुळे ग्रामीण व कृषी क्षेत्राला प्रत्येक प्रकारच्या वापरासाठी पाणी उपलब्ध झाले. पिण्याचे पाणी, घरगुती वापरासाठी पाणी, शेतीला पाणी उपलब्ध करणे शक्य झाले. यामुळे पारंपरिक पिकांसाठी फळे व भाजीपाल्यासारखी पिके घेणेही शक्य होत आहे.

Wardha Accident : पोलीस कुटुंबाच्या अंत्यसंस्काराला गहिवरले समाजमन!

या पॅटर्नमुळे ग्रामीण व कृषी व्यवस्था मजबूत होत असल्याचेही माधव कोटस्थाने यांनी राज्यमंत्री हेलोंडे यांना सांगितले. राज्यमंत्री हेलोंडे यांनी पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली असता कमलनयन जमनालाल बजाज संस्थेचे वर्धा समन्वयक महेंद्र फाटे यांनी केलेल्या जलसंधारण कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी आणखी काही वेळ बसून उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.

Accident in Wardha : पोलीस कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात चौघे ठार!

सेलू तालुक्यातील अनेक गावात भूजलाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गोपालन व म्हशी पालन, शेतीपूरक व्यवसायाला सुरुवात केली. यामुळे दूध व मांस व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले.