Serious allegations by Bhiwandi East MLA Rais Sheikh : भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांचा गंभीर आरोप
Mumbai : शिक्षकांच्या बदल्या, त्यातल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या, जिल्हा बदल्या या नेहमीच चर्चेत राहतात. यासंदर्भात भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी घणाघाती आरोप केलेले आहेत. जिल्हा बदलीच्या प्रक्रियेत शिक्षकांची मागणी, आवश्यकता आहे की नाही, हे न पाहता थेट बदल्या केल्या जातात. यामध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याचाही आरोप शेख यांनी केला आहे.
विधानसभेत आज (१७ मार्च) बोलताना आमदार शेख यांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, शिक्षकांची जिल्हा बदली ही सर्वात मोठी समस्या झालेली आहे. एखादा शिक्षक भिवंडीत शिकवत असेल आणि तो लातुरमध्ये राहणारा असेल. जेथे किंवा जेथून शिक्षकाची बदली आपण करत आहो, तेथे मागणी किंवा आवश्यकता आहे की नाही, हे न पाहता थेट बदली केली जाते. यामध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे.
Ajit Pawar : २० टाळकी असताना पाठींबा कसला देताय ? दादांनी उडवली खिल्ली
सीसीटीव्हीचे आश्वासन फोल..
प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही असायला हवे. पण प्रत्यक्षात ते लावण्यात आलेले नाहीत. मुंबई शहरातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. तेव्हा भिवंडीची तर गोष्टच करायला नको. सरकारने आश्वासन दिले होते. पण पूर्ण केले नाही, ही बाब त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. बीएमसीतील दोन महत्वाचे मुद्दे त्यांनी यावेळी सभागृहासमोर मांडले.
२०१० मध्ये बीएमसीची शाळा भाड्याने घेतली. त्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त खोल्या खासगी व्यक्तीकडे आहेत. तेथे शाखा उघडली. आता तेथे खासगी कॉलेज सुरू आहे. राजकीय दबावात ते कॉलेज खासगी व्यक्तीला देण्याचा घाट घेतला जात आहे. यासंदर्भात एक धोरण तयार केले पाहिजे. एका माजी मंत्र्याची ती शाळा असल्याचा घणाघाती आरोप आमदार शेख यांनी केला.
सामान्यपणे कार्यरत शिक्षक परीक्षा देऊन BO (Beat Officer) बनतात. पण आता त्या पद्धतीलाही फाटा दिला जात आहे. यावेळी बाहेरून BO आणले जात आहेत. २०-२० लाख रूपये घेऊन ही भरती केली जात असल्याचेही आमदार शेख यांनी सांगितले. मुलाखतींमधून हे बीओ घेतले जात आहेत. केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच बीओच्या पदांवर बाहेरून लोक आणले जात असल्याचा आरोप आमदार रईस शेख यांनी केला.