Breaking

Terroirist attack in Pahalgam : दहशतवादाचा कायमचा बिमोड व्हावा

Terrorism should be eradicated permanently : काँग्रेसचे बुलढाण्यात आंदोलन, हल्ल्याचा नोंदवला निषेध

Buldhana जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अमानुष घटनेने देश हळहळला असून, देशाच्या अखंडतेसाठी घातक ठरणाऱ्या दहशतवादाचा कायमचा बिमोड करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केली आहे.

चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर २४ एप्रिल रोजी झालेल्या निषेध आंदोलनात, प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी “भारत माता की जय”, “पाकिस्तान मुर्दाबाद”, “देश के सन्मान में काँग्रेस मैदान में” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

 

 

 

Chandrashekhar Bawankule : विनापरवानगी मुख्यालय सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना बावनकुळेंनी सुनावले!

 

 

या आंदोलनात शहराध्यक्ष अथरूद्दीन काझी, डॉ. मोहमंद इसरार, सचिन बोंद्रे, प्रा. निलेश गावंडे, डॉ. सत्येंद्र भुसारी, रामभाऊ जाधव, रिक्की काकडे, प्रदीप पचेरवाल, तसेच काँग्रेस व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्रुवीकरणाविरोधात जनतेची एकजूट गरजेची असल्याचेही बोंद्रे यांनी नमूद केले. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा हल्ल्यांवर नागरिकांनी शांतता व एकतेने प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Devendra Fadanvis : आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था, सायंकाळपर्यंत १८३ पर्यटक मुंबईत येणार !

“अतिरेकी भारतात कसे पोहोचले? त्यांना शस्त्रसाठा कोठून मिळाला? आणि ते नंतर पसार कसे झाले?” असे प्रश्न उपस्थित करत, या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी बोंद्रे यांनी केली. “अतिरेकी हे कुठल्याही धर्माचे नसतात, ते मानवतेचे शत्रू आहेत. त्यांचा बंदोबस्त होणे ही काळाची गरज आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.