Uri, Pathankot, Pulwama and Pahalgam attacks are intelligence failure : दहशतवादी हल्ल्याने उपस्थित केले अनेक प्रश्न
Nagpur : जम्मू – काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे लष्कराच्या गणवेषात आलेल्या दहशतवाद्यांनी मंगळवारी (२२ एप्रिल) हल्ला केला. यामध्ये २८ पर्यटक ठार झाले. हल्ल्याच्या वेळी तेथे २००० पर्यटक होते. पण मिल्ट्री, पोलीस किंवा इतर कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. ही बाब अतिशय गंभीर आहे. उरी, पठाणकोट नंतर पुलवामा आणि आता पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे सरकारचे इंटेलिजन्स करते तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पहलगाम भारत – पाकिस्तानच्या सीमेवर असलेला भाग नाही. सीमेपासून लांब आहे. अशा ठिकाणी आतंकवादी येतात आणि हल्ला करून जातात. म्हणजे ते काही हल्ल्याच्या दिवशी आलेले नसावे. तर काही दिवस आधीच बॉर्डर पार करून आलेले असणार, असा एक कयास लावला जात आहे. सरकारचे इंटेलिजन्स फक्त विरोधी पक्षातील नेत्यांचे, आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्यासाठीच आहे का? या अशा हल्ल्यांची माहिती घेण्यासाठी नाही का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Terrorist attack in Pahalgam : दहशतवादाला ठेचून काढा; लोक उतरले रस्त्यावर!
१४ फेब्रुवारी २०१९ चे पुलवामाचे उदाहरण समोर असताना. सहा वर्षांनंतरही सरकारने आपले इंटेलिजन्स का सुधारले नाही. उरी, पठाणकोट, पुलवामा अन् आता पहलगाम, या घटना अतिशय गंभीर आहे. अतिरेकी पर्यंटकांना धर्म विचारत होते, असंही एक नरेटीव तयार केलं जात आहे. पण यावर विश्वास बसणं अनेकांना अवघड जात आहे. खरोखरच असं विचारू विचारू आतंकवाद्यांनी गोळ्या झाडल्या असतील का, हासुद्धा प्रश्न आहेच.
Jammu – Kashmir Attack : जम्मू – काश्मीरमधील पर्यटनावर होणार दुरगामी परिणाम !
मृतांच्या यादीमध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन नावही आहे. दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी धर्म विचारला असता तर मुस्लीम व्यक्ती ठार झाला नसता. हा हल्ला म्हणजे सरकारचे अपयश आहे. गृहमंत्री अमित शाह काश्मीरला गेले होते. तेथे सुरक्षा व्यवस्थेच्या बैठकीला उमर अब्दुल्ला यांना बसू दिले नव्हते. त्यांच्यावर शाह यांचा विश्वास नाही का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेतून सहानुभूती मिळवायची आणि बिहार व पश्चिम बंगालच्या निवडणुकी लढवायच्या, असा तर कार्यक्रम सत्ताधाऱ्यांनी आखला नसावा ना, अशीही शंका घेतली जात आहे.