Chief Minister Devendra Fadnavis in touch with District Collector and Tehsildar : जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती
Pune : पुणे जिल्ह्यातील तळेगावनजिक इंदोरी येथील इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही लोक वाहून गेल्याचा माहिती आहे. किती लोक वाहून गेले, याबद्दल नेमका आकडा कळू शकला नाही. घटनेचे गांभीर्य पाहता एनडीआरफ टीमला पाचारण करण्यात आले आहे.
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मावळात झालेल्या या अपघाताची बातमी ऐकून अतिशय दुःख झाले. या घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबंधित तहसीलदारांच्या संपर्कात मी सातत्याने आहे.
Gogawale ON Rashmi Thackeray : शिवसेनेच्या फुटीमागे ठाकरे ‘वहिणीं’चा हात !
यामध्ये काही जण वाहून गेल्याचीही माहिती आहे. मात्र नेमके किती जण वाहून गेले, हे कळू शकलेले नाही. युद्धपातळीवर त्यांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. मदत कार्याला वेग देण्यात आला आहे. दुर्घटना घडल्यानंतर आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेल्या आहेत.
Pandharpur Darshan : अवघ्या एक तासात होणार आता विठुरायाचे दर्शन
एकूण ३२ लोक जखमी झाले. त्यांपैकी सहा जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळी रवाना झालेले आहेत. या अपघात प्रकरणी मी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. प्रशासनाने आवश्यक ती सर्व व्यवस्था केलेली आहे. किती लोक वाहून गेले, याबद्दल आत्ताच आकडा सांगणे योग्य होणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.