Breaking

The Prohibition of Child Marriage Act (PCMA) : मांडव पडला, पण अक्षता पडण्यापूर्वीच बालविवाह रोखला!

Damini and Bharosa team succeed in preventing child marriage : दोघेही १७ वर्षांचे; भरोसा व दामिनी पथकाची कामगिरी

Gondia लग्न ठरलं, तयारी झाली, मांडव पडला आणि आता वधु-वरावर अक्षता पडणार तोच भरोसा व दामिनी पथक पोहोचले. चौकशी केली. तर वधु-वर दोघेही १७ वर्षांचे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा विवाह रोखण्यात आला. बालविवाहावर बंदी घालून अनेक वर्ष लोटली. पण अजूनही समाजात दुर्दैवाने या वाईट रुढी सुरूच आहेत. अशात प्रशासनावरच हे सारे रोखण्याची भिस्त आहे. त्यामुळे दामिनी आणि भरोसा पथकाने केलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.

मुलगा-मुलगी अल्पवयीन असतानाही त्यांचा विवाह लावण्याचा प्रकार उघडकीस आला. भरोसा व दामिनी पथकाच्या सजगतेने हा बालविवाह थांबविण्यात आला. आमगाव तालुक्यातील ग्राम मोहरानटोली येथे हा प्रकार घडला. आमगाव तालुक्यातील ग्राम मोहरानटोली येथे हा बालविवाह लावला जात आहे, अशी माहिती दामिनी पथकाला मिळाली.

Santosh Deshmukh murder case : कृष्णकृत्यांच्या जखमांवर सद्भावनेची फुंकर!

या माहितीच्या आधारावर दामिनी व भरोसा पथकाचे अंमलदार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाळे व त्यांचे सहकारी नियोजित विवाहस्थळी पोहोचले. तेथे लग्न समारंभाची तयारी सुरू होती व मंडप टाकलेले होते. यावर पथकाने नियोजित वर वधू यांची चौकशी केली असता मुलाचे वय १७ (रा. आमगाव) व मुलीचे वय १७ (रा. आमगाव) असल्याचे कळले.

त्यानंतर दामिनी पथक व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गोबाडे यांनी मुला-मुलीच्या पालकांना बालविवाह कायद्याबाबत माहिती देऊन समज दिली. तेव्हा मुला-मुलीच्या पालकांनी नियोजित विवाह रद्द करीत असल्याचे मान्य केले. त्यानंतर मुला-मुलीसह त्यांच्या पालकांना सीडब्ल्यूसी CWC समिती समोर हजर करण्यात आले.

Water shortage issue : साडी नेसून उपसरपंचाने फोडला पाण्यासाठी टाहो!

पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये प्रभारी पोलिस उपअधीक्षक (गृह) नंदिनी चानपूरकर यांच्या मार्गदर्शनात भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक मनीषा निकम, दामिनी पथकातील शिपाई राजेंद्र अंबादे, पूनम मंजुटे, वैशाली भांदक्कर, प्रीती बुरेले, राधेश्याम रहांगडाले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गोबाळे, रवींद्र टेंभुर्णे, मनीषा चौधरी, भागवत सूर्यवंशी, अशोक बेलेकर, अमित बेलेकर, ज्ञानेश्वर पटले, दीपमाला भालेराव यांनी ही कामगिरी केली.