Chief Minister’s approval came within an hour after Sudhir Mungantiwar’s phone call : ‘त्या’ कुटुंबीयांना मिळणार ५ लाख; मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ केले मंजूर
Chandrapur : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांचा गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १० मे रोजी घडली. त्यानंतर राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना केली.
आमदार मुनगंटीवार यांची मागणी अवघ्या काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. मृतांच्या कुटुंबीयांना लवकरच प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. यावरून आमदार सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात उत्तम समन्वय असल्याची बाब अधोरेखीत झाली.
Forest Department : बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात आज प्राणीगणना!
गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे गोपाल गणेश साखरे (बुलढाणा), पार्थ बाळासाहेब जाधव (अहिल्यानगर, शिर्डी) आणि स्वप्निल उद्धवसिंह शिरे (छत्रपती संभाजीनगर) हे तीन विद्यार्थी १० मे रोजी वैनगंगा नदीत पोहोण्यासाठी गेले होते. यात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय शिक्षणाच्या सुरुवातीलाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेनंतर आमदार मुनगंटीवार यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत काही तासांतच प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मंजूर केली. आमदार मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील उत्तम समन्वयाचा नमूना येथे पुन्हा एकदा बघायला मिळाला.
Operation Sindoor : सून ले पाकिस्तान, बाप तुम्हारा हिंदुस्तान!
वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. समाजसेवेचे स्वप्न उराशी बाळगून वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केलेल्या युवकांना अचानक मृत्यूने आपल्या कवेत घेतले. गेलेला जीव पैशांनी परत आणता येत नाही, पण दुःखाचा डोंगर कोसळला असताना कुटुंबीयांना थोडा तरी दिलासा मिळावा, हीच माझी भावना होती, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मान्यता दिली, यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.