Adv. Dharampal Meshram said, injustice against the Pardhi community is our priority : २५ आणि २६ जूनला नागपुरात होणार पारधी न्याय संकल्प परिषद
Nagpur : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली २५ आणि २६ जून रोजी नागपुरातील रवी भवन येथे राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील पारधी सामाजावरील १८८ प्रकरणांपैकी निवडक ३० प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. पारधी समाजावरील अन्याय आणि अत्याचाराच्या प्रकरणांना निकाली काढण्यासाठी हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
आदिवासी विकास विभागाने यावल, सोलापूर, मुंबई, डोंबीवली, घोडेगाव, छत्रपती संभाजी नगर, कळमनूर, किनवट, धारणी, पांढरकवडा, पुसद, चिमूर, नागपूर, अकोला येथीर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांना तक्रारदारांना सुनावनीस उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत. याचा खर्च संबंधित कार्यालयांनी उचलण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
Dangerous roads : कमकुवत पुलांप्रमाणे झुडपेही ठरताहेत धोकादायक !
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त आयुषी सिंह आणि उपायुक्त दिगंबर चव्हाण यांच्या सहकार्याने या सुनावणीचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी १४ एप्रिल रोजी रवी भवन येथे झालेल्या आदिवासी पारधी न्याय परिषदेत ११८ प्रकरणांवर चर्चा झाली होती. ही सुनावणी अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ आणि नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ अंतर्ग दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
यासंदर्भात अॅड. धर्मपाल मेश्राम म्हणाले, पारधी समाजावरील अन्याय आणि अत्याचार थांबवणे आणि पिडितांना न्याय मिळवून देणे हे आमचे प्राधान्य आहे. या सुनावणीमुळे दुर्बल घटकांना संरक्षण आणि न्याय मिळण्यास मदत होणार आहे. या सुनावणीच्या माध्यमातून पीडितांना अर्थसहाय्य आणि कायदेशीर मदत देण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
Dangerous roads : कमकुवत पुलांप्रमाणे झुडपेही ठरताहेत धोकादायक !
आदिवासी पारधी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष बबन गोरामन म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पारधी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही पहिलीच ऐतिहासिक घटना आहे. यामुळे समाजाला न्याय मिळेल आणि अन्याय कमी होईल. आदिवासी पारधी विकास परिषदेचे युवकचे अध्यक्ष आतीश पवार आणि अनिल पवार यांनीही आयोगाचे उपाध्यक्ष, आयुक्त आणि अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. हा उपक्रम सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल मानन्यात येत आहे.