Breaking

Uday Samant : हिंदी भाषा सक्तीचे धोरण, उद्धव ठाकरे यांच्याच काळात

Minister Uday Samant criticizes Uddhav Thackeray : मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

Mumbai : महाराष्ट्रात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारले. डॉ. माशेलकर समितीने पहिली ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत, असा प्रस्ताव दिला होता. ठाकरे यांनीच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव स्वीकारला, मात्र आता हिंदी सक्ती नसताना देखील त्यांच्याकडून जाणीवपूर्वक हिंदी भाषेवरुन राजकारण केले जात आहे, अशी टीका उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली.

मंत्री सांमत म्हणाले की, हिंदीची सक्ती कुठेही नाही आणि हिंदी अनिवार्य देखील नाही ही शासनाची भूमिका आहे. मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काहीजण या मुद्द्याचे राजकारण करत आहेत,
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणी करण्यासाठी एक कार्यगट स्थापन केला होता. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या या समितीने इयत्ता पहिले ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत असा अहवाल सादर केला. तो 27 जानेवारी 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला, असे सांमत म्हणाले.

Harshvardhan Sapkal : विकृतीचा कळस लोणीकर, अन्यथा… पळता भुई थोडी करू – सपकाळ

 

राज्यात शैक्षणिक धोरण 2020 च्या धोरणानुसार बारावीपर्यंत हिंदी सक्तीबाबत तेव्हा हरकत का घेतली नाही, असा सवाल मंत्री सामंत यांनी यावेळी केला. ज्यांच्या काळात हिंदी सक्ती लागू झाली, तेच आता हिंदी भाषेबाबत मोर्चा काढत आहेत, ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने काहीजण भावनिक साद घालून मराठी आणि हिंदी भाषे वरुन राजकारण करत आहेत, अशी टीका पण त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या

Conflict on Hindi language compulsion : हिंदी सक्तीला विरोध! मराठी माणसांचा ५ जुलैला भव्य मोर्चा

मुंबईत मराठी भाषा केंद्र साकारले जाणार आहे. यासाठी 100 कोटी खर्च केले जाणार आहेत. मराठी भाषेचे उपकेंद्र ऐरोली मध्ये होणार आहे. विश्व मराठी संमेलन, मराठी साहित्या बाबत महिलांसाठी, युवकांसाठी साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन सरकारकडून केली जातात. मराठी मातृभाषा आणि मराठी प्रत्येकालाच आली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे, असे पण मंतसामंत म्हणाले.

Supriya Sule : परिस्थिती बेताची असताना, कर्ज घेऊन प्रोजेक्ट कशाला करता?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी साहित्यिकांची भूमिका समजून घेण्याबाबत चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहितीही सामंत यांनी दिली. पुढील आठवड्यात साहित्यिकांची बैठक घेणार आहे. मराठी भाषा मंत्री म्हणून वेळ पडल्यास राज ठाकरे यांची भेट घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठी बरोबरच जेवढ्या जास्त भाषा येतील तेवढं चांगल असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. याची आठवण पण सामंत त्यांनी करून दिली.

____