Poor condition of roads; Shiv Sena gives ultimatum to engineer : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांचा इशारा; गिट्टी-मुरुमांमुळे शेतकरी घायाळ
Akola प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत घुसर ते दोनवाडा आणि गुडधी ते बाभुळगांव या मार्गांवरील रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. शेतकऱ्यांना बी बियाणे नेण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्ग नसल्याने शेतकरी व इतर नागरिकांना गिट्टी व मुरुमांमुळे घायाळ व्हावे लागते आहे. या स्थितीत तातडीने रस्ते दुरुस्त केले नाहीत, तर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी दिला आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत घुसर-दोनवाडा, गुडधी-बाभुळगांव या मार्गांवरील कामकाज अंदाजपत्रकानुसार न होता अत्यंत संथगतीने सुरु असून खरीप हंगाम सुरु असताना शेतकऱ्यांना शेतजमिनीवरील कामे करताना असुविधा होते आहे. या मार्गांवरील काम करत असताना पर्यायी मार्गाचा विचार केलेला नाही. सिमेंट कॉँक्रीटचे काम असलेल्या भागांमध्ये मुरुम भरला गेलेल्या नाही.
दुसऱ्या बाजूला अधिक गिट्टी टाकण्यात आल्याने वाहनचालकांना व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकरी घायाळ होत असून बळगाड्याने बियाणे व खते शेतापर्यंत नेण्यात असुविधा निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर घुसर-दोनवाडा, गुडधी-बाभुळगांव या मार्गांवरील काम चार दिवसांत पूर्ण करावे, असा अल्टिमेटम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभागाच्या अभियंत्यांना दिला आहे.
Rural Development Ministry : १२,४९६ सरपंचपदे असणार महिलांसाठी आरक्षित
खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना शेतात पेरणीसाठी बियाणे व खते पोचविणे गरजेचे असते. मात्र असलेल्या असुविधांमुळे शेतकरी अडचणीत आहेत. जर तातडीने रस्ते दुरुस्त केले गेलेल्या नसतील, तर जिल्हा शिवसेनेच्यावतीने आ. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी दिला आहे.