Breaking

Uddhav Thackeray group : ठाकरे गटाचे पदाधिकारी बदलले, नशीब बदलणार का?

Shiv Sena makes changes in city executive : महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी

Nagpur भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेची वाताहत झाली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नागपूर शहर कार्यकारीणीत तर बदल केले, पण त्यामुळे पक्षाचे नशीब पालटणार का, हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.

निवडणुकीत महाविकासआघाडीची नेमकी भूमिका स्पष्ट झालेली नाही. या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेने वेगळीच भूमिका घेतली आहे. जर काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेतली नाही तर स्वबळावर लढण्याची पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. शिवसैनिकांना सन्मानजनक जागा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पण काँग्रेसच्या भरवश्यावर न राहता निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा निर्णय शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादीला फायदा होणार?

नागपूर महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेता संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव सेनेची बैठक महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात नागपूर शहरात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी शाखाप्रमुख, गटप्रमुखांची नियुक्ती करून प्रत्येक वार्ड व प्रभागामध्ये संघटन मजबूत करण्याचे निर्देश महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी बैठकीत दिले.

Vanchit Bahujan Aghadi : वंचितमध्ये नव्या गड्याकडे जबाबदारी; नेतृत्व बदलले

बैठकीत राज्य संघटक सागर डबरासे, नरेंद्र म. मांगाडे, अभिषेक देशमुख, दीपकजी भोले, मनीषधर जयपूरकर, राजेश गजभिये, अनिल बोरडे, जावेद शेख, अमोल दासरखार, हर्षद शेख, मयूर कुळे, आसिफ शेख, संतोष भैसारे, सागर चरडे, संजय काळे, दीपक पोहणेकर आदी उपस्थित होते. यावेळी शहरात संघटन बळकट करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्यांमुळे नागपूर शहरात पक्षाला अधिक बळ मिळेल व आगामी निवडणुकीत पक्ष मजबुतीने उतरू शकेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.