Appeal from all religions to maintain peace in Akola : सर्वधर्मीयांनी दिला शांततेचा संदेश; सलोखा बैठक संपन्न
Akola राज्यातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी विविध धर्मगुरू आणि सामाजिक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत सर्व धर्म, जात आणि पंथ एकत्र येऊन दंगली रोखण्याचा निर्धार करण्यात आला.
महाराष्ट्रात जातीय तणाव आणि धार्मिक दंगलीमुळे वातावरण दूषित होत आहे. अकोल्यात यापूर्वी झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा असा उद्रेक होऊ नये, यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे, हा संदेश या बैठकीतून देण्यात आला.
या चर्चासत्रात भन्ते राजज्योती, जावेद जकारिया (कच्ची मेमन जमात), आकाश कराळे (संभाजी ब्रिगेड), संजूभाऊ सूर्यवंशी (मराठा महासंघ), किशोरजी बळी (अक्षरदीप कला अकादमी), मनोहर राठोड (गोर सेना), फादर राहुल हिवरे (आलायन्स चर्च), आकाश शिरसाट (सम्राट अशोक सेना), ऍड. बोरे (गुरुदेव सेवामंडळ), पवन पवार (स्वराज्य संघटना), संदीप शेरेकर (शिवराजे प्रतिष्ठान) आदींनी सहभाग घेतला.
Vidarbha Farmers : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८० कोटींचा मदत निधी मंजूर!
वंचित बहुजन युवा आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांसह भारतीय बौद्ध महासभा, बार असोसिएशन, महिला आघाडी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या बैठकीत भाग घेतला.
या विषयावर पुढील आढावा बैठक २३ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती निश्चित करण्यात येईल. बैठकीचे प्रास्ताविक वैभव खडसे यांनी केले, सूत्रसंचालन राजकुमार दामोदर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन शिराळे यांनी मानले.