Breaking

Vanchit Bahujan Aghadi : तर पाकिस्तानसोबत युद्धाचीही तयारी ठेवा!

 

Vanchit Aghadi will protest the terrorist attack in Pahalgam : काश्मीरमधील हल्ल्याचा निषेध; वंचिततर्फे २ मे रोजी मुंबईत लाक्षणिक आंदोलन

Pune काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले आहेत. या अमानुष घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला कठोर उत्तर देण्याची मागणी होत असतानाच, वंचित बहुजन आघाडीतर्फे २ मे रोजी मुंबईत एकदिवसीय शांततेच्या लाक्षणिक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की, केंद्रातील राजकीय नेतृत्व आतंकवादाला योग्य प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरत आहे. मात्र भारतीय सेना दहशतवाद्यांचा सामना करण्यास पूर्णतः सक्षम आहे. त्यामुळे भारत सरकारने नरमाईची भूमिका न घेता, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे प्रशिक्षण व सैनिकी तळ तातडीने नष्ट करावेत. गरज पडल्यास युद्ध करण्यासही मागेपुढे पाहू नये, असे वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगण्यात आले आहे.

Devendra Fadanvis : उबाठाला देशातील जनता माफ करणार नाही !

या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी २ मे २०२५ रोजी दुपारी २ वाजता हुतात्मा स्मारक, फोर्ट, मुंबई येथे एकदिवसीय शांततेच्या आणि लाक्षणिक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मंडळे, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि सुजाण नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) घेऊन मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादाविरुद्ध एकसंघ भूमिका घेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Local Body Elections : सगळं लक्ष निवडणुकीवर, भाजपचा जोर बुथ समित्यांवर!

वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, २ मे २०२५पूर्वी कोणताही स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करू नये तसेच प्रसारमाध्यमांमध्ये कोणतेही वैयक्तिक वक्तव्य अथवा मीडिया बाईट देऊ नये. पक्षाची अधिकृत भूमिका हीच अंतिम भूमिका राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करावी आणि २ मे रोजी हुतात्मा स्मारक, फोर्ट, मुंबई येथे दुपारी २ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी स्पष्ट केले आहे.