Protesters reached the SDO office for farmers’ issues : समतेचे निळे वादळ व प्रहार जनशक्ती पक्षाची आक्रमक भूमिका
Buldhana शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ३ मे रोजी मलकापूरमध्ये समतेचे निळे वादळ संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या संयुक्त विद्यमाने एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग पाहायला मिळाला.
शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकापासून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे व प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी केले. मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला.
Uddhav Thackrey Shivsena : रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरीतून निषेध!
तेथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन एसडीओ व तहसीलदार यांना सादर करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत विविध वक्त्यांनी शासनाच्या धोरणांवर टीका केली आणि तातडीने मागण्या मान्य करण्याची मागणी केली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख अजित फुंदे, शहर प्रमुख शालिग्राम पाटील, बलराम बावस्कर, राहुल तायडे, संघर्ष वानखेडे, समतेचे निळे वादळ संघटनेचे तालुका प्रमुख राजेंद्र पवार, शहर प्रमुख मोहन खराटे, प्रसिद्धी प्रमुख दिलीप इंगळे, श्रीकृष्ण भगत यांच्यासह दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चात मलकापूर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.