Unseasonal rains cause damage to rabi crops : अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे नुकसान, राष्ट्रवादीने केली नुकसानभरपाईची मागणी
Gondia आमगाव तालुक्यात 1 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमगाव तालुका शाखेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना तहसीलदार आमगाव यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात, तालुक्यातील विविध भागांमध्ये पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी म्हाडा सभापती नरेशकुमार माहेश्वरी, जिल्हा परिषद गोंदियाचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, पंचायत समिती सदस्य शीलाताई ब्राह्मणकर, तालुका उपाध्यक्ष सुनील ब्राह्मणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष महेंद्र रहांगडाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक टिकाराम मेंढे, माजी जि.प. सदस्य जियालाल पंधरे यांचा समावेश होता.
Caste wise census : जातिनिहाय जनगणना; राहुल गांधींचा मोठा विजय !
या व्यतिरिक्त स्वप्नील कावडे, सुमित कन्नमवार, प्रमोद शिवणकर, संतोष श्रीखंडे, ललित ठाकूर, विजय भांडारकर, दिलीप फुंडे, गिरीश पटले, बाळाभाऊ महारवाडे, कीर्ती बोळणे, मुन्ना पटले, धनीराम (बबलू) बिसेन, चुनीलाल शहारे, सेवकराम दोनोडे यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतांतील धानाचे पीक पूर्णतः भिजून गेले आहे, काही ठिकाणी काढणीच्या स्थितीत असलेले पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गावर आर्थिक संकट कोसळले आहे.
“शासनाने शेतकऱ्यांच्या संकटाची तात्काळ दखल घेऊन सर्वेक्षण करून योग्य ती नुकसान भरपाई दिली नाही, तर आंदोलन करण्याची वेळ येईल,” असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिला आहे.