Congress leader Vijay Wadettiwar’s attack on the Mahayuti government : ५०० रुपये देणाऱ्या सरकारची किव येते
Nagpur : ज्याला कुटुंबात आधार नाही, अश्या महिलांना केंद्र सरकार 1500 देत होते. त्याचा त्यांना फायदा झाला होत होता. पण दीड हजारांत घर चालते का, हे सरकारला कळायला पाहिजे. 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येत आहे. केंद्राकडुन पैसे मिळतात म्हणून राज्य सरकारने पैसे कमी करणे चुकीचे आहे. अशा कृप्त्या लढवणे योग्य नाही. ज्यावेळी योजना लागू केली, तेव्हा बुद्धी भ्रष्ट झाली होती का, असा परखड सवाल काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
नागपुरात आज (१५ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले. ते म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केले. नागपुरात दंगल झाली, हे पाप सरकारचेच आहे. नागपूर शहरात अशी परिस्थिती कधीच नव्हती. दोन समुदायांत रोष निर्माण झाला होता. दोन समाजांतील दरी कमी करण्यासाठी आम्ही सदभावना रॅली काढणार आहोत. ही रॅली दिक्षाभूमीतून काढू. दिक्षाभूमी ते ताजबाज अशी ही रॅली असणार आहे. त्याचा फायदा समाजाला होईल.
एस.टी. कामगारांच्या वेतनासंदर्भात वडेट्टीवार Vijay Wadettiwar म्हणाले, पैशाची तरतूद असेल म्हणूनच हा जीआर काढला असणार. सरकारने पैसे नाही दिले तर बनवाबनवी होईल. शाळांमधील घोटाळ्यांबाबत ते म्हणाले, उल्हास नरडला बळीचा बकरा बनवल्या जात आहे. अंतिम निर्णय हा फाईलच्या चौकशीच्या शेवटी असतो. खालचे चोर सोडून नरडचा बळी घेतला जात आहे. यात अनेक शाळा सत्ताधाऱ्यांच्या आणि त्यांच्या जळवळच्या लोकांच्या आहेत. संस्थाचालकांनी मान्यता दिल्यावर प्रस्ताव उपसंचालकांकडे जातो. त्यामुळं जे काही चुकीचे झाले, ते खालच्या स्तरावरच झाले आहे.
उल्हास नरडने उलटपत्र देऊन चौकशीची मागणी केली. यापूर्वी कारवाई झालेला डोरलीकर कोणाच्या जवळच आहे, हे आम्हाला माहीत आहे, त्याची विभागीय चौकशी होऊ द्या. समिती नेमा समितीचा अहवाल आल्यावर कारवाई अपेक्षीत होती. पण येथे थेट नरडला अटक करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संस्था आहेत. या संदर्भात SIT ची नेमणूक करा, अशी आमची मागणी आहे. आवश्यक्ता असल्यास न्यायिक चौकशी करा, असे वडेट्टीवार म्हणाले.
BJP Congress : शेगावमध्ये शहराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात?
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भात सरकारने बोलघेवडेपणा करू नये. दोषींवर गुन्हे दाखल केले तरच त्यांची मर्दुमकी दिसेल. कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. पाणी टंचाईबाबत विचारले असता, विदर्भात वैनगंगा कोरडी पडली आहे. सध्या केवळ ८ टीएमसी tmc पाणी धरणात आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला विदर्भाला समोर जावं लागेल. वेळ पडल्यास सरकारने टॅंकरचा पुरवठा सुरू केला पाहिजे.