Congress leader Vijay Wadettiwar’s criticism of the RSS and Narendra Modi : स्वातंत्र्य काळापूर्वी संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र होते
Nagpur : गेल्या १०० वर्षांत दोन समाजांत दरी निर्माण करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास राहिलेला आहे. स्वातंत्र्य काळापूर्वी संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र आले होते. संघाची भूमिका परिस्थितीनुसार सतत बदलली आहे. संघाचा अजेंडा विभाजनाचा आहे. तर काँग्रेसची भूमिका सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे. संघाची भूमिका एका विशिष्ट विचाराला घेऊन चालणारी आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी संघावर केला.
विजय वडेट्टीवार यांनी आज (२९ मार्च) नागपुरात पत्रकारांशी बातचित केली. यावेळी ते म्हणाले, आता शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने संघाची पुढची भूमिका बदलेल, अशी अपेक्षा ठेवूया. नरेंद्र मोदी १२ वर्षानंतर संघ मुख्यालयात येत आहेत. म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास सूर्योदयापासून सूर्यास्ताकडे जातोय असे म्हणावे लागेल. ते पंतप्रधान झाल्यापासून कधीच रेशीमबागेत आले नाहीत. अन् आता येत आहेत, म्हणजे त्यांच्या विजयात नरेंद्र मोदींचा करिष्मा नाही तर संघाचा करिष्मा आहे, हे कदाचित मोदींना असं पटलं असेल म्हणून ते येत आहेत.
Vijay Wadettiwar : राजकारण आणि धर्म वेगळा रहावा, यावर डॉ. बाबासाहेबांचा जोर होता !
राज्य कर्जबाजारी झालं आहे. ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून अर्थव्यवस्था खिळखळी केली. आता दिलेल्या आश्वासनांचा विसर या सरकारला पडलाय. आम्ही जुमला केला, आमची नियत आणि औकात नाही तुम्हाला कर्जमाफी देण्याची, असं शेतकऱ्यांना सांगाव. जून कर्ज न फेडल्याने नवीन कर्ज मिळणार नाही. शेतकरी संतापला आहे. तो आता तुम्हाला नांगरून गड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसीची स्कॉलरशिप बंद पडल्यास जमा आहे. ओबीसींची मते घेऊन ओबीसी तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम झाले. पैसे नसल्याने अनेक योजनांना कट लावले. भटक्या जमातीची घरकुल योजनेचे पैसे अडकले. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचे दोन वर्षांपासून पैसे मिळत नाहीत. योजना फक्त नावालाच आहे.. त्यामुळे हे बंद केले पाहिजे. पुढील एक ते दोन वर्ष तरी राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल असं मला वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.
Vijay Wadettiwar : महायुतीमध्ये अमित शाह यांना न माननारा एक गट !
मालेगावातील साध्वींच्या सत्काराबद्दल विचारले असता, त्याबद्दल न बोललेले बरं. एखाद्या न्यायाधीशाच्या घरात नोटा जळलेल्या मिळाल्या. चार स्तंभाची काय स्थिती आहे? आम्हाला इमर्जन्सी म्हणून हिणवत होते. मात्र आता त्यापेक्षाही गंभीर स्थिती झाली आहे. व्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाही. कोर्टातून कोणाच्या बाजूने कोणता निर्णय होईल, हे सांगता येत नाही. न्यायव्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या इशारावर चालत असल्याचा समज होत चाललाय, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.