Samajwadi Party’s Abu Azmi and BJP – Two sides of the same coin : हिंदू – मुस्लीम वाद निर्माण करण्याचे प्रयत्न
Nagpur : समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी वारकरी आणि नमाज पठण यांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद दूरवर उमटले. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क आझमींची लायकी काढली. पण हा वाद नव्हे, तर ठरवून केलेली कृती आहे, असे काँग्रेसला वाटते. अबू आझमी आणी भाजप हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आझमीने एक पिल्लू सोडायचे आणि भाजपने हिंदू-मुस्लीम भांडण लावायचे, हे ठरलेलं आहे, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, अबू आझमी जे वक्तव्य करतात, ते भाजपच्या इशाऱ्यावरून करतात, हा माझा स्पष्ट आरोप आहे. अबू आझमी दबावातून असे वक्तव्य करतात. म्हणून मला असं वाटतं की, वारकऱ्यांसंदर्भात जे वक्तव्य अबू आझमी यांनी केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी प्रतिक्रीया दिली, ती हिंदू-मुस्लीम वाद पुन्हा उभा करण्यासाठी दिली. याचा फायदाही भाजपलाच होतो आहे. ही अबू आझमी आणि भाजपची मिलीभगत आहे.
Vijay Wadettiwar : वडेट्टीवारही कडाडले; म्हणाले, महायुतीने आपली नियत दाखवली !
हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भात वडेट्टीवार म्हणाले की, हिंदी ऐच्छिक असावी. परंतू महाराष्ट्रात ही बोलीभाषा आहे. संतांच्या वाणीतून, भाषेतून मराठी भाषा तयार झाली आहे. म्हणून जगात कुठेही गेले तरी एखाद्या माणसाने मराठी भाषा बोलली, तर चमकून मागे बघितले जाते. संत परंपरा नष्ट करण्यासाठी निश्चितच आमचा विरोध आहे. कुणाची तरी चापलुसी करण्यासाठी हिंदी भाषा सक्तीची करण्याला आमचा विरोध आहे.
भारत-पाकिस्तान युद्धात ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर आपल्या मागे एकही देश उभा राहिला नाही. उलट पाकिस्तानच्या मागे अनेक देश उभे राहिले. पंतप्रधान जगभर फिरत असतात. पण परराष्ट्र धोरणाची भूमिका स्पष्ट नाही. चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था निर्माण केल्याचा दावा आपण करतो. आपण इजराईलच्या मागे उभे आहोत. तर किमान तशी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सद्यस्थितीत शोले चित्रपटासारखी (आधे इथर जाओ, आधे उधर जाओ) स्थिती आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेनेच्या आंदोलनानंतर जीवन प्राधिकरण ‘बॅकफुटवर’!
१५ तारखेपर्यंत माॉन्सून येईल, असा अंदाज होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणीही केली. कापसाचे बियाणे पेरळ्यावर त्याला अंकुर आले. पण पाऊस न आल्याने वाणी नावाची किड लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे. यामध्ये सरकारने लवकरात लवकर लक्ष घालावे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवावी आणि त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.