Vijay Vadettiwar targets DCM Eknath Shinde : अडकलेल्या पर्यटकांना मदत करतानाही श्रेय लाटण्याची स्पर्धा
Mumbai : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने तेथे अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी हालचाली केल्या. काल एक आणि आज एक अशा दोन विमानांनी पर्यटकांना मुंबईला आणण्यात आले. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः श्रीनगरला गेले. त्यावर काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी ताशेरे ओढले आहे.
यासंदर्भात वडेट्टीवार यांनी X वर प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहीतात, ‘महायुती सरकारमधील नेत्यांमध्ये श्रेयवादाची आणि स्वतःच्याच मार्केटींगची स्पर्धा किती असावी? जे कधी विमानात बसले नाही त्यांना पण एकनाथ शिंदे यांनी विमान प्रवास घडवून आणला. ही वेळ काय, कोणी, कधी कसले श्रेय घ्यायचे याचे भान राहिलं नाही का? पर्यटकांना सुखरूप आणणे महत्वाचे की विमान प्रवास? आणि ते केलं म्हणून पण श्रेय घ्यायचे?’
Vijay Wadettiwar : जग कुठे चाललं अन् हे कबरीच्या मागे लागले !
पहलगाममध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झाला, काही जखमी झाले, काही अडकले आहेत. त्यांना धीर देण्यापेक्षा सगळ्यात आधी तिथे कोण पोहोचतं, याची स्पर्धा झाली. गरज नसताना उपमुख्यमंत्री यांनी काश्मीर वारी केली. इथवर न थांबता तुम्ही कसे गेले, कशी मदत केली, याचे गोडवे गाण्यासाठी शिंदे सेनेचे खासदार पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांवर किती उपकार केले, अशी भाषा करतात.
Chandrashekhar Bawankule : बदललेल्या सकारात्मक वातावरणाला गालबोट लावले !
महायुती सरकारमधील मंत्री, खासदार सगळ्यांनी जबाबदारीचे भान सोडले आहे का, किमान अशा घटनांमध्ये तरी स्वतःचे मार्केटींग करणे सोडा.’, असे ट्विट करत विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांना चांगलेच सुनावले आहे.