Breaking

Voters Number : भाजपने पाच महिन्यांत ४१ लाख मतदार वाढवले कसे ?

Congress state president Harshvardhan Sapkal makes serious allegations against BJP : तब्बल आठ टक्क्यांची वाढ हाच कळीचा मुद्दा

Mumbai : सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर २०२४ च्या निवडणुकीपर्यंत पाच वर्षांत मतदारांची संख्या ३१ लाखाने वाढली. पण २०२४ ची लोकसभा निवडणूक ते २०२४ ची विधानसभा निवडणूक या अवघ्या पाच महिन्यांत ४१ लाख मतदार वाढले. यातच मोठे गौडबंगाल आहे. यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरही संशय बळावला आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

यासंदर्भात आज (ता. ७ जून) मुंबईच्या टिळक भवनातील पत्रकार परिषदेत सपकाळ म्हणाले, २००४ च्या निवडणुकीत प्राथमिक मतदानाची आकडेवारी ६० टक्के होती, ती अंतिम ५९.५ टक्के झाली. २०१४ साली प्राथमिक मतदान ६२ टक्के तर अंतिम ६३ टक्के झाल्याचे जाहीर करण्यात आले. २०१९ साली प्राथमिक टक्केवारी ६०.४६ टक्के होती, तर अंतिम टक्केवारी ६१.१० टक्के होती. परंतु २०२४ च्या निवडणुकीत मात्र मतदानाची प्राथमिक टक्केवारी ५८.२२ टक्के होती. मात्र अंतिम टक्केवारी ६६.५ टक्के जाहिर करण्यात आली. तब्बल आठ टक्क्यांनी वाढलेली टक्केवारी हा कळीचा मुद्दा आहे.

Rahul Gandhi : महाराष्ट्र विधानसभेत ‘मॅच फिक्सिंग’ सारखी हेराफेरी : राहुल गांधी

आधीच्या चार-पाच निवडणुकांतील मतदानात एका टक्क्याचीही तफावत नसताना २०२४ च्या निवडणुकीत आठ टक्के तफावत आली कशी? वास्तविक पाहता आधुनिक तंत्रज्ञानाने सर्व यंत्रणा अद्ययावत असताना अशा पद्धतीने घोळ कसा काय झाला, याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही. मतांच्या चोरीचा मुद्दा येवढ्यावरच थांबत नाही, तर जे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, तर त्यांनीच उत्तर देणे अपेक्षित आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे उत्तर का देत आहेत, असा सवाल सपकाळ यांनी केला.

Dcm eknath shinde : किडनी विकाराने ग्रस्त लाडक्या बहिणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत

मतदान चोरीचा हा पॅटर्न आता बिहार निवडणूक, मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही वापरण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असाही गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.