BJP leader MLA Sudhir Mungantiwar’s demand to CM Devendra Fadnavis for the farmers of Chandrapur district : शेतकऱ्यांनी केले आवेदन अन् भरली डिमांड
Chandrapur : चंद्रपूर हा जगातील सर्वात उष्ण जिल्हा म्हणून पुढे आला आहे. गेल्या काही वर्षांत येथील पाण्याची पातळी सातत्याने घसरत गेली आहे. आता तर पाण्याची पातळी १५० फुटांपर्यंत खाली गेली आहे. अशा परिस्थितीत सौर पंप काम करत नाहीत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची समस्या गंभीर बनली आहे. यासाठी उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता विशेष बाब म्हणून वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कृषी पंपांना वीज जोडणी मिळवण्यामध्ये येत असलेल्या अडचणींसंदर्भात भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बंडू गौरकर यांनी आमदार मुनगंटीवार यांना निवेदन दिले होते. शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर असलेल्या मुनगंटीवारांनी त्याची तात्काळ दखल घेत आमदार मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Sudhir Mungantiwar : शिवस्मरणातून आ. सुधीर मुनगंटीवार यांची सांस्कृतिक सिंहगर्जना
अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतांतील कृषी पंपांना वीज जोडणी मिळवण्याकरता आवेदन केलेले आहेत. त्यासाठी डीमांडचा भरणाही केलेला आहे. परंतु त्यांना अद्यापही विज जोडणी मिळालेली नाही. बळीराजा कृषी वीज मापी योजना लागू झाल्यापासून शेतकऱ्यांना कृषी पंप वीज जोडणी देणे बंद करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात योग्य कार्यवाहीसाठी संबंधितांना आदेश द्यावे, असेही आमदार मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.