Breaking

Women and Child Development : फडणवीसानी उलटा क्रम लावला की काय ?

 

Balasaheb Thorat mocked Fadnavis for reversing the order : महिलांची दिशाभूल करू शकतो, हे या विभागाने दाखवून दिले

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम राबवण्यात आला. या मोहिमेत्या पहिल्या टप्प्याचे मुल्यांकण नुकतेच जाहिर करण्यात आले. यामध्ये अल्पसंख्याक विभागाचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले जात आहेत. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या मुल्यांकणामध्ये पहिला क्रमांक महिला बालविकास विभागाला देण्यात आला. पण या विभागाने लाडक्या बहीणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण केलेच नाही. आपण महिलांची दिशाभूल करू शकतो, हे या विभागाने दाखवून दिले. तरीही या विभागाला पहिला क्रमांक देण्यात आला, याचे आश्चर्य वाटते. कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलटा क्रम लावला असावा, अशी शंका बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केली. नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Shivsens uddhav Balasaheb Thackrey : शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा

मी अनेक वर्ष मंत्री राहिलेलो आहे. रेटिंग देण्याचे निकष काय आहेत, हे तपासले पाहिजे. सर्वच स्तरांवर हा विभाग अपयशी ठरला आहे. आधार नसलेल्या लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जातो. पण गेल्या चार महिन्यांपासून या योजनेतील लाभार्थ्यांना पैसे देण्यात आलेले नाहीत. निराधारांना पैसे देऊ शकत नाही, म्हणजे हे सरकार कुचकामी आहे. या सरकारचे अपयशी १०० दिवस, असेच या उपक्रमाचे वर्णन करता येईल, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Digital India : मानधनाविना हतबल; संगणक परिचालकांचा कामबंद एल्गार

राज्यभर लोक रस्त्यांवर गचके खात आहेत. प्रत्येक गचक्यामागे लोकांना सरकारची आठवण येते. तरीही बांधकाम खात्याला दुसरा क्रमांक देण्यात आला. कदाचित पीक विमा योजना बंद केली म्हणून कृषी विभागाला तिसरे स्थान देण्यात आले असावे, अशी खोचक टीका करत हा सरकारचा शेतकरी विरोधी निर्णय असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.