Breaking

R. S. Gawai memorial : दादासाहेब गवई स्मारकासाठी १२ कोटींचा अतिरिक्त निधी!

 

Additional funds of Rs 12 crore from government for the memorial : अमरावतीच्या वडाळी परिसरात उभारले जातेय स्मारक

Amravati केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. उर्फ दादासाहेब गवई यांच्या अमरावती येथील स्मारकाच्या उर्वरित कामांसाठी राज्य सरकारने १२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी टप्पा-१ अंतर्गत २०.०३ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आला होता. त्यामुळे एकूण निधी ३२ कोटी रुपयांहून अधिक झाला आहे.

अमरावतीच्या वडाळी परिसरात हे स्मारक उभारले जात असून, त्याची पायाभरणी २५ जुलै २०१६ रोजी होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यानंतर ३० ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या पायाभरणी समारंभास फडणवीस उपस्थित होते.

या स्मारकाच्या टप्पा-१ मधील २०.०३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास नगर विकास विभागाने २९ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर इतका निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. मात्र, उर्वरित व अतिरिक्त कामांसाठी १४.९८ कोटी रुपयांची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पत्रातून स्पष्ट केले. त्यानंतर नगर विकास विभागाने या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देत १२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला.

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, केंद्राचा निधी यायचा असेल तर राज्याचा वापरा, पण…

या स्मारकात दादासाहेब गवई यांचा भव्य पुतळा, छायाचित्र गॅलरी, कन्व्हेन्शन सेंटर, विधिमंडळातील भाषणांचे संकलन, ॲम्फी थिएटर, गेस्ट हाऊस, म्युझियम, ओपन थिएटर, सभागृह आणि क्लोज थिएटर यांचा समावेश असणार आहे. हे स्मारक केवळ एक स्मरणस्थळ न राहता, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे केंद्र ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Din : झेंडावंदनाला २१ कर्मचाऱ्यांनी मारली दांडी, कारवाई होणार

दादासाहेब गवई यांनी सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला. विधानसभेचे अध्यक्ष, खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशा विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे कार्य केले. त्यांच्या जीवनकार्याची ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे स्मारक एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. त्यांचे विचार, मूल्ये आणि सामाजिक कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.