Breaking

Dangerous bridges : पुलांवर भरोसा ठेऊ नका, नदी-नाल्यांवर जाण्याचे टाळा !

 

Five people drowned in Godavari river in Dharmabad, Nanded : नदी – नाल्यांवरील पूल एरवी सुस्थितीत असले तरी पावसाळ्यात सततच्या पावसामुळे कमकुवत होतात

Pune : पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या अपघातात ५५ पर्यटक वाहून गेले तर चार जण ठार झाले. हा पूल कमकुवत झाला होता. त्यामुळे हा अपघात घडला. याशिवाय राज्यात अशाच इतर दोन घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. काल एका दिवसात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोणत्याही नदी किंवा नाल्यावरील पुलावरून सुचना झुगारून जाणे धोकादायक झाले आहे.

काल (ता. १५ जून) कुंडमळा येथे भीषण दुर्घटना घडली. याशिवाय अशाच दोन घटना नांदेड आणि बुलढाणा जिल्ह्यात घडल्या. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे विश्वगंगा नदीत मायलेकी पाय घसरून पडल्याने नदीत बूडून मरण पावल्या. तर नांदेडच्या धर्माबाद येथे गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. पावसाळ्यात नदी-नाल्यांवर जाणे तसेही धोकादायक असते. तरीही लोक हा धोका पत्करतात आणि जीव गमावून बसतात. त्यामुळे या दिवसांत अती साहस करू नये, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Indrayani bridge collapsed : ‘ती’ एक चूक केली नसती, तर पूल कोसळला नसता !

नदी – नाल्यांवरील पूल एरवी सुस्थितीत असले तरी पावसाळ्यात सततच्या पावसामुळे कमकुवत होतात. त्यामुळे अशा पुलांवरून जाताना प्रशासनाने तेथे दर्शवलेल्या सर्व सुचनांचे पालन केले पाहिजे. सुचनेनुसार मनाई असलेल्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. पाचचारी पुल असल्यास त्यावरून वाहने नेण्याचा धोका पत्करू नये. कुंडमळा येथील दुर्घटना पादचारी पुलावरून वाहने नेल्यामुळे झाल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. असे करून वाहनधारक स्वतःच्या जीवासर इतरांचाही जीव धोक्यात घालतात. त्यामुळे असले प्रकार करू नये, असेही प्रशासनाकडून बजावण्यात आले आहे.

The bridge collapsed : मावळात पूल कोसळून दोन ठार, काही वाहून गेले, एनडीआरएफला पाचारण !

कारवाई होणार..
कुंडमळा येथे काल झालेल्या अपघातानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. ज्या पुलांवरून जाता – येताना लोक सुचनांचे पालन करणार नाहीत. नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर तेथेच तात्काळ कारवाई करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यापुढे असे अपघात होऊ नये, म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. आतातरी नागरिकांना स्वतःसह इतरांची सुरक्षा ध्यानात ठेऊनच वर्तन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.