Breaking

Chandrashekhar Bawankule : बदललेल्या सकारात्मक वातावरणाला गालबोट लावले !

 

Chandrashekhar Bawankule said the changed positive atmosphere has spoiled : आतंकवाद्यांना शोधून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

Nagpur : जम्मू – काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला अमानवीय आहे. लोकांचे धर्म विचारून गोळीबार करण्यात आला. हिंदुंना जाणीवपूर्वक टारगेट करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हल्ल्यातील मृत व जखमींच्या कुटुंबींयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. काश्मीरमधील वातावरण बदलले होते. एक सकारात्मक वातावरण तयार झाले होते. त्याला गालबोट लावण्याचे काम या हल्लेखोरांनी केले आहे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, घटनेची संपूर्ण माहिती सरकारने घेतली आहे. विशेष विमानांचीही व्यवस्था केली आहे. ज्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केले, त्यांना सरकार शोधून काढून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या घटनेचे कुणीही राजकारण करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत देशभरातील जनतेने पूर्ण शक्तीनीशी सरकारच्या सोबत उभे राहिले पाहिजे आणि सरकारचे हात मजबूत केले पाहिजे.

Jammu – Kashmir Attack : जम्मू – काश्मीरमधील पर्यटनावर होणार दुरगामी परिणाम !

जम्मू – काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर तेथील वातावरण सकारात्मक झाले होते. पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली होती. काश्मीरमध्ये रोजगार निर्माण झाला होता. हे सर्वकाही या एका हल्ल्याने बिघडवून टाकले आहे. वातावरण पुन्हा शांत करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. काश्मीरमध्ये पुन्हा शांतता नांदेल, पर्यटन पुन्हा वाढेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Jammu – Kashmir Attack : भय तिथले संपले नाही..!

नागपूर आणि अमरावती येथीलही काही लोक काश्मीरमध्ये अडकलेले आहेत. विमानाची व्यवस्था करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. सरकारने तातडीने अधिक विमानांची व्यवस्था केलेली आहे. सर्व पर्यटकांना सुखरुपपणे परत आणण्यात येईल. तेथे असलेल्या लोकांनी घाबरून जाऊ नये, हिंमत ठेवावी आणि आमच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.