Breaking

Caste-wise censuses : सामाजिक न्यायाची दारे उघडतील !

 

Sudhir Mungantiwar said that now the doors of social justice will open : जातिनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी, ऐतिहासीक

Chandrapur : जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. ओबीसी समाजाने सर्वाधिक जोरकसपणे ही मागणी लावून धरली होती. अखेर काल (३० एप्रिल) केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. या निर्णयाचे देशभरात स्वागत करण्यात आले. अगदी विरोधकांनीही या निर्णयाचे स्वागत केले. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी क्रांतिकारी आणि ऐतिहासीक निर्णय म्हणत केंद्र सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

यासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे सामाजिक न्यायाची दारे उघडतील. वंचित घटकांच्या न्याय हक्कांना बळ मिळेल. योजनांचा योग्य लाभ मिळेल. जातिनिहाय जनगणनेमुळे समतेच्या मूलभूत मूल्यांची पायाभरणी होणार आहे. सर्व जातींना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारचा हा निर्णय उपयोगी ठरणार आहे.

Maharashtra Day : जनतेने मेहनतीने महाराष्ट्राला अग्रस्थानी पोहोचवले !

जातिनिहाय जनगणनेमुळे देशात सामाजिक न्यायाची दारे खुली होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी आणि ऐतिहासीक आहे. या निर्णयामुळे सर्व समाज घटाकांसाठी अधिक प्रभावी योजना आखण्यास हातभार लागणार आहे, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरमध्ये माता महाकाली यात्रेची सुरुवात; मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे यात्रेकरुंना मिळणार उत्तम सुविधा

१९४७ पासून काँग्रेसने कधीच जातिनिहाय जनगणना करण्याचा विचारही केला नाही. पण २०१४ पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर सतत याबाबत ओरड केली. आजवर त्यांनी केलेली मागणी बेगडी होती. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. पण अद्यापही पुढे येऊन पंतप्रधानांचे कौतूक करण्याचो औदार्य विरोधी पक्षातील एकाही नेत्याने दाखवले नाही. ही बाब त्यांच्यातील खुजेपणा अधोरेखीत करते, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले.