Congress leader’s taunt on Ajit Pawar’s statement : नाना पटोलेंचा टोला, म्हणाले ‘मुख्यमंत्रीपद एवढं सोपं नाही’
Bhandara ‘कधी कधी मला वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं’… हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान सध्या महाराष्ट्रात Hot Topic आहे. विरोधकांकडून या विधानावर टोमणे मारले जात आहेत. त्यात आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही उडी घेतली आहे. ‘मुख्यमंत्री होण्यासाठी जनतेचा आशीर्वाद आवश्यक असतो’ असा टोला त्यांनी अजितदादांना लगावला आहे.
“स्वप्न बघणं हा सगळ्यांचाच अधिकार आहे. पण ती स्वप्नं प्रत्यक्षात येतीलच, असं नाही. स्वप्नं पाहण्यापेक्षा लोकांची कामं करणं गरजेचं आहे,” असं सांगत नाना पटोलेंनी दोघांवर निशाणा साधला आहे. यातून त्यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेसह महायुतीला देखील टोला लगावला आहे.
Political Leaders : पुढाऱ्यांप्रमाणे अधिकाऱ्यांनीही मालमत्ता जाहीर करावी !
अजित पवारांनी नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं की, “मी कित्येक वर्षं उपमुख्यमंत्रीपद सांभाळतोय. अनेकदा वाटतं की आता मुख्यमंत्री व्हावं. पण यात मी काही चुकीचं बोलतोय असं वाटत नाही.” त्यांच्या या वक्तव्याने एकप्रकारे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आलं.
यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, “अजितदादा हे नेहमी सत्ता जवळ ठेवणारे नेते आहेत. पण जनतेचा आशीर्वाद आणि लोकशाही व्यवस्था यांच्याशिवाय मुख्यमंत्रीपद मिळणं शक्य नाही. भाजपसोबत गेल्यामुळे त्यांचं राजकीय गणित बदललं आहे, हे ते विसरू नयेत.”
Congress Leader : पहिले देशातच पप्पू म्हणायचे, आता देशाबाहेरही पप्पू म्हणतात !
राज्यातील सत्तास्थिती, आगामी विधानसभा निवडणुका आणि आघाड्यांचे समीकरण लक्षात घेता, अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा कितपत प्रत्यक्षात उतरेल, याबद्दल राजकीय विश्लेषकांतही चर्चा सुरू झाली आहे.