Breaking

Our government : सेवा शुल्क वाढले, ‘आपले सरकार’चा वापर कमी होणार !

Ravikant Tupkar said that the use of ‘Aaple Sarkar’ will decrease : शेतकरी, विद्यार्थी व केंद्र चालकांमध्ये रोष

Buldhana : ‘आपले सरकार’ या सेवा केंद्रातून विद्यार्थी, शेतकरी व सामान्य नागरिक आवश्यक दाखले घेतात. शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र महत्वाची भूमिका बजावतात. सरकारने सेवा शुल्कामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. हे शुल्क कमी न केल्यास या सेवा केंद्राचा वापर कमी होण्याची भीती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली आहे.

सरकारने शुल्कवाढीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि जुनेच शुल्क कायम ठेवावे, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. निवेदनानुसार विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला या सर्व घटकांतील लोकांना सेवा केंद्रामधून विविध प्रकारची कागदपत्रे घ्यावी लागतात. परंतु वाढलेल्या शुल्कामुळे आर्थिक ताण पडत आहे.

Farmer ID : शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ची नोंदणी अत्यावश्यक !

सामान्य नागरिकांसह सेवा केंद्र चालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. शुल्क वाढल्यामुळे नागरिकांकडून केंद्राचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. शासन निर्णयानुसार महसूल विभाग, सामाजिक न्याय विभाग, ग्रामीण विकास विभाग, गृह विभाग आदींच्या एकूण १०२७ सेवा या केंद्रा मार्फत दिल्या जातात. जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, उत्पन्न दाखले, वय व अधिवास प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र यांसारख्या अत्याव्श्यक सेवांचे दर आता दुपटीने वाढले आहेत.

Nitin Gadkari in Akola : रखडलेल्या कामांना मिळणार का गती?

विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी ही दरवाढ त्रासदायक आहे. त्यामुळे शासनाने ही शुल्कवाढ रद्द करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.